कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांच्याकडून पाच कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. खंडणी न दिल्यास संजय घोडावत यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी हातकणंगले पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. रमेशकुमार ठक्कर असं आरोपीचं नाव असून त्याला मुंबईतून अटक केली आहे. दरम्यान रमेशकुमार ठक्करचा साथीदार व्ही पी सिंह मात्र अद्याप फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
उद्योगपती संजय घोडावत कोल्हापूराच्या हातकणंगले तालुक्यातील जयसिंगपूरमध्ये राहतात. १३ ते १८ जूनदरम्यान घोडावत यांना व्हॉट्सअॅप मेसेज, टेक्स मेसेज आणि अनेकदा व्हॉट्सअॅपवरून आरोपींनी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याचा आरोप घोडावत यांनी केला आहे. तर खंडणी न दिल्यास त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनाही जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी घोडावर यांनी हातकणंगले पोलिसांत गुन्हा दाखल केला. संजय घोडावत यांच्यासह त्यांचे भागीदार निलेश बागी यांनाही अशाचप्रकारे धमकी मिळाल्याचा दावा करत तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.
या तपासात हातकणंगले पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या रमेशकुमार प्रजापती ठक्कर या आरोपीला मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. तर दिल्लीचा रहिवासी असलेला ठक्करचा साथीदार व्ही पी सिंग पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. तर दिल्लीचा रहिवासी असलेला ठक्करचा साथीदार व्ही पी सिंग पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. या एका आरोपीकडून पोलिसांनी १ लाख रुपयांची रोकडसह, १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि एक्स्क्लुझिव्ह डायरी असं लिहिलेली वही पोलिसांनी जप्त केली आहे.
मोबाईल नेटवर्कच्या शोधात झाडावर चढलेल्या मुलावर वीज पडल्याने मृत्यू, तर तीन जखमी