घरक्राइममुंबई पुन्हा एकदा हादरली; वृद्धेमहिलेची गळा चिरुन हत्या

मुंबई पुन्हा एकदा हादरली; वृद्धेमहिलेची गळा चिरुन हत्या

Subscribe

मुंबईतील गुन्हेगारी वृत्ती दिवसेंदिवस वाढतच चालली असून खुलेआम होणाऱ्या हत्या प्रकरणे समोर येत आहे

मुंबईत हत्येचे सत्र हे सुरुच असून गेल्या महिन्याभरात १२ हत्येच्या घटना घडल्या आहेत. मुंबईकरांसाठी ही फारच चिंतेची बाब ठरत आहे. अशात फेब्रुवारी महिन्यातही दिवसाआड हत्या होणाऱ्या अनेक घटना डोकेवर काढताना दिसत आहे. गेल्या सहा दिवसांत सहा हत्येच्या घटनांची नोंद मुंबई पोलिसांनी केली आहे.  या हत्याप्रकरणांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. खुलेआम होत असलेल्या या हत्याप्रकरणांनी मुंबईतील गुन्हेगारी वृत्ती वाढीस लागली आहे. यात अंधरीत विवाहितेच्या हत्येची घटना समोर आली. दरम्यान कल्याणमधील वृद्ध महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. यासोबतच वरळीतील ७७ वर्षीय वृद्धेच्या हत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

वरळीतील व्यवसायिक कुंटुंबीय बंगल्यातील वरच्या मजल्यावर असताना तळ मजल्यावर झोपलेल्या वृद्ध महिलेचे हात पाय बांधून लुटीच्या उद्देशाने गुरुवारी या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली. यात केअरटेकर महिलेच्या संगनमताने ही हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. कल्याणमध्येदेखील शनिवारी रात्री घरामध्ये एकट्याच राहणाऱ्या हंसाबाई ठक्कर या वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पश्चिमेतील दत्तआळी परिसरात ही घटना घडली आहे. या महिलेला अनेकवेळा संपर्क करुनही त्या फोन उचलत नसव्याने नातेवाइकांनी घरी येऊन पाहिले असता, त्यांचा मृतदेह रक्तबंबाळ झाला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे वाचा- गळ्यावर धारदार शस्राने वार करुन पुण्यात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याची दगडाचे ठेचून हत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -