घरताज्या घडामोडीखुशखबर! मुलीच्या लग्नात सरकार देणार १ तोळं सोनं भेट, असा घ्या लाभ

खुशखबर! मुलीच्या लग्नात सरकार देणार १ तोळं सोनं भेट, असा घ्या लाभ

Subscribe

मुलीच्या लग्नात मुलीला सरकारकडून एक तोळे सोने गिफ्ट म्हणून दिले जाणार आहे.

प्रत्येक आई-वडिलांना आपल्या लाडक्या लेकीचे लग्न अगदी धुमधडाक्यात व्हावे, असे वाटत असते. याकरता आई-वडिल मुलीच्या जन्मापासूनच तिच्या लग्नासाठी पैशाची जमवाजमव करत असतात. मग, तिच्या लग्नातील खर्च असो किंवा तिला घालण्यात येणारे दागिने असो. मात्र, आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आता मुलीच्या लग्नात मुलीला सरकारकडून एक तोळे सोने गिफ्ट म्हणून दिले जाणार आहे. त्यामुळे आता लग्न करणाऱ्या मुलींच्या आई-वडिलांना थोडासा का होईना दिलासा मिळणार आहे.

सोन मिळणार भेट

मुलीच्या लग्नात तिला भेट देण्यासाठी आसाम सरकारने नवी योजना आणली आहे. आसाम सरकारने अरुंधती गोल्ड स्कीम नावाच्या एका योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेंतर्गत मुलींना विवाहात सरकारकडून १० ग्रॅम सोनं म्हणजेच एक तोळं सोनं भेट म्हणून देण्यात येणार आहे. यामुळे गरीब पालकांना अरुंधती गोल्ड स्कीमचा मोठा फायदा होणार आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कुटुंबांना याची मदत होणार आहे. विशेष म्हणजे इच्छा असूनही केवळ परिस्थितीमुळे मुलींना मदत न करु शकणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

या कुटुंबियांनाच घेता येणार लाभ

अरुंधती सुवर्ण योजनाचा लाभ अशा कुटुंबांना घेता येणार आहे. ज्या कुटुंबांत एक किंवा दोन मुली आहेत. मात्र, त्याहून अधिक म्हणजे तीन किंवा चार मुली असतील तर त्या कुटुंबांतील मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ तेव्हाच घेता येईल जेव्हा विवाहावेळी मुलीचे वय १८ वर्षांहून अधिक आणि मुलाचे वय २१ वर्षांहून अधिक असेल. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांहून कमी असायला हवे. त्याहून अधिक उत्पन्न असल्यास या योजनेचा फायदा मिळणार नाही.

असा घ्या योजनेचा लाभ

एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारकडून मुलींच्या विकासासाठी, त्यांच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. त्यातीलच ही एक उपयुक्त योजना आहे. अरुंधती गोल्ड स्कीमचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला शासनाकडे माहितीसह एक अर्ज दाखल करावा लागणार आहे. आसाम सरकारने गेल्या वर्षी ही योजना सुरु केली होती. सरकारच्या या योजनेने मोठी मदत होणार असल्याने सरकारचे कौतुक केले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बेरोजगारांसाठी खुशखबर! PhonePe देणार ७०० जणांना नोकरी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -