उत्तर प्रदेशात लग्न आटोपून निघालेल्या गाडी लखनऊमधील इंदिरा तळ्यात पडली. या गाडीत १५ से १६ लोक होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. माहितीनुसार या घटनेतील ६ मुले पाण्यात वाहून गेली आहेत. एनडीआरएफची पथक मुलांचा शोध घेत आहेत.
A vehicle carrying passengers fell in Indira canal in Nagram, Lucknow, today morning. Rescue operations underway. Chief Minister has taken cognizance of the incident and directed the SSP and the SDRF to make all possible efforts for search & rescue of the persons who have drowned pic.twitter.com/pHDfJ39EM3
— ANI UP (@ANINewsUP) June 20, 2019
लखनऊ येथील पटवा गावाजवळील ही घटना आहे. एनडीआरएफचे पथक आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरुच आहे. ही गाडी बाराबंकी येथील कटरा येथे जाताना, या गाडीला अपघात झाला. गाडीमधील पुरुष आणि महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. परंतू, ६ मुले बेपत्ता आहेत. ही घटना रात्रीची घडली, असे सांगितले जात आहे.