घरदेश-विदेशकेरळमध्ये कार अपघातात ५ जण जागीच ठार

केरळमध्ये कार अपघातात ५ जण जागीच ठार

Subscribe

केरळमध्ये कार अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एर्नाकुलमच्या परंबवूर येथे गुरवारी पहाटे ही घटना घडली. या कारमधून ७ जण प्रवास करत होते. कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट बसला जाऊन धडकली. या अघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले.

केरळमध्ये कार आणि बसला भीषण अपघात झाला आहे. केरळच्या एर्नाकुलममधील परंबवूर येथे ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर ५ ही मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे.

पहाटेच्या दरम्यान झाला अपघात

एर्नाकुलमच्या परंबवूर येथे गुरवारी पहाटे ही घटना घडली. या कारमधून ७ जण प्रवास करत होते. इडुक्की जिल्ह्यातील अलप्पारा येथून हे सात जण कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होते. एका नातेवाईकाला विमानतळावर सोडण्यासाठी हे सर्व जण निघाले होते. मात्र काही अंतारवर पोहचताच त्यांच्या कारला अपघात झाला. अपघाता दरम्यान मुसळधार पाऊस देखील पडत होता.

- Advertisement -

कार चालकाला लागली झोप

कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट बसला जाऊन धडकली. हा अपघात ऐवढा भीषण होता की कार थेट बसच्या खाली गेली यामध्ये कारचा चक्काचुरा झाला. अपघातामध्ये कारमध्ये असणाऱ्या ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. कार चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -