देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असतानाच कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटने चिंतेत भर घातली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. तर कोरोना मृतांचा आकडाही १ हजारांपेक्षा कमी झाला आहे. गेल्या १०२ दिवसानंतर आज देशात ४०,००० हून कमी कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काहीसा दिसाला मिळत आहे. विशेष म्हणजे नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा ५६ हजार वर पोहचली आहे. त्यामुळे कोरोना रिकव्हरी रेट हा ९६. ८७ टक्क्यांवर पोहचला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
#COVID19 | India reports less than 40,000 daily new cases after 102 days. Recovery Rate increases to 96.87%: Union Health Ministry
— ANI (@ANI) June 29, 2021
गेल्या २४ तासांत देशात ३७ हजार ५६६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९०७ कोरोनाग्रस्तांनी आपले प्राण गमावले आहेत. तर ५६ हजार ९९४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परते आहेत. देशात आत्तापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा हा ३ कोटी ३ लाख १६ हजार ८९७ वर पोहचला आहे. तर मृतांची एकूण संख्या ३ लाख ९७ हजार ६३७ झाली आहे. देशात आजपर्यंत २ कोटी ९३ लाख ६६ हजार ६०१ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. देशात सध्या ५ लाख ५२ हजार ६५९ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालय किंवा घरीच उपचार सुरु आहेत. तसेच देशात आत्तपर्यंत ४० कोटी ८१ लाख ३९ हजार २८७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यातील १७ लाख ६८ हजार ००८ चाचण्या गेल्या २४ तासांत झाल्याचे आयसीएमआरने सांगितले.
#COVID19 | A total of 40,81,39,287 samples tested up to June 28. Of which, 17,68,008 samples were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/OJcqVrWgp2
— ANI (@ANI) June 29, 2021