घरक्राइम'पुष्पा' पाहून टोळी बनवण्याचा निर्णय, रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीची हत्या

‘पुष्पा’ पाहून टोळी बनवण्याचा निर्णय, रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीची हत्या

Subscribe

यादरम्यान तिन्ही अल्पवयीन मुलांना आपल्या मित्रांना प्रभावित करायचे होते आणि त्यासाठी त्यांनी व्हिडीओ बनवून त्यांची हत्या करून सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा प्लॅनही केला. या तिघांचीही योजना जागतिक स्तरावर या टोळीला लोकप्रिय करण्याचा होता. त्यांनी आपल्या टोळीचे नाव बदनाम गँग असे ठेवले आणि नंतर त्यांनी गुन्हे करण्यास सुरुवात केली.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशभरात पुष्पाचा क्रेझ आहे. त्या दरम्यान राजधानी दिल्लीच्या जहांगीर पुरीमध्ये हत्येची घटना उघडकीस आली असून, त्यामुळे पोलिसांनाही धक्का बसलाय. नुकताच प्रदर्शित झालेला पुष्पा चित्रपट आणि भोकल ही वेबसिरीज पाहिल्यानंतर 3 अल्पवयीन मुलांनी एक टोळी बनवण्याचा निर्णय घेतला आणि मोठी घटना घडवण्याची योजना आखली.

यादरम्यान तिन्ही अल्पवयीन मुलांना आपल्या मित्रांना प्रभावित करायचे होते आणि त्यासाठी त्यांनी व्हिडीओ बनवून त्यांची हत्या करून सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा प्लॅनही केला. या तिघांचीही योजना जागतिक स्तरावर या टोळीला लोकप्रिय करण्याचा होता. त्यांनी आपल्या टोळीचे नाव बदनाम गँग असे ठेवले आणि नंतर त्यांनी गुन्हे करण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

19 जानेवारीला हे तिघे जहांगीर पुरीच्या के ब्लॉकमध्ये पोहोचले. येथे त्यांनी व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. यानंतर दोन अल्पवयीन मुलांनी शिबू नावाच्या व्यक्तीला अडवून त्याच्यावर अचानक काठ्यांनी हल्ला केला. एका अल्पवयीन व्यक्तीने त्याला मागून पकडले आणि तिसऱ्याने त्याच्यावर चाकूने वार केले. शिबूचा मृत्यू झाला आणि तिघेही तिथून पळून गेले.

मदतनीस होता शिबू

पोलिसांनी सांगितले की, शिबू हा एका वर्कशॉपमध्ये मदतनीस म्हणून काम करायचा. ही घटना घडली तेव्हा शिबू कामावरून घरी परतत होता. अचानक झालेल्या हल्ल्यातून तो सावरू शकला नाही आणि नंतर त्याच्यावर वार करण्यात आले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, त्याच्या हत्येनंतर पोलिसांनी तपास केला असता, जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन आरोपी गुन्हा करताना दिसत होते. त्यानंतर दोन दिवसांतच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. उत्तर पश्चिम दिल्लीच्या डीसीपी उषा रंगनानी यांनी सांगितले की, तो स्वत:ला बदनाम गँगच्या नावाने संबोधत असे. तिन्ही पुष्पा या चित्रपटाच्या मुख्य पात्रापासून प्रेरित झाल्या होत्या आणि त्यांनी तेच होण्यासाठी असे केले. या घटनेचा व्हिडीओ बनवून तिघांनाही इंस्टाग्रामवर पोस्ट करून बदनाम व्हायचे होते.

- Advertisement -

हेही वाचाः Anil Deshmukh : चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझे अनिल देशमुखांना विचारणार प्रश्न

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -