घरताज्या घडामोडीसर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलाच्या दरात ५० ते ६० रूपयांची घट, जाणून घ्या

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलाच्या दरात ५० ते ६० रूपयांची घट, जाणून घ्या

Subscribe

खाद्यतेलाच्या दरात घट झाली असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खाद्यतेलाच्या दरात ५० ते ६० रूपयांची घट झाली आहे. खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केल्याने सध्या देशांतर्गत बाजारपेठेत मोहरी आणि सोयाबीन तेल, तेलबिया, क्रूड पाम तेल आणि पामोलिनचे भाव घसरले आहे. मात्र, देशी तेलांच्या वाढत्या मागणीमुळे भुईमूग आणि कापूस तेलबियांचे भाव मात्र कायम राहिले आहेत.

अडीच वर्षांपूर्वी सोयाबीन आणि सूर्यफूल आयातीवर ३८.२५ टक्के आणि सीपीओवर ४१.२५ टक्के आयात शुल्क होते, जे स्वतंत्र हप्त्यांमध्ये कपात केल्यानंतर सध्या चार दशलक्ष टन सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या खाद्यतेलावर शून्य शुल्क आहे.

- Advertisement -

देशातील आयातदारांना या घसरणीच्या चपळाईत टिकून राहणे अशक्य होत आहे. याशिवाय सरकारने वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये आयात शुल्क कमी केले आहे. परदेशात खाद्यतेलाचे दर घसरल्याने आयात शुल्कात अनेकवेळा कपात केल्यानंतर दोन वर्षे शुल्कमुक्त आयातीला परवानगी देण्याचे कारण समजणे अनाकलनीय असल्याचे समजले जात आहे. अदानी विल्मर ते पतंजली ब्रँडच्या खाद्यतेलाच्या किंमती १० ते १५ रूपयांनी घसरल्या आहेत.

तेलाचे दर प्रतिलिटर १० ते १५ रूपयांनी खाली आले आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, १ जून रोजी शेंगदाणा पॅक केलेल्या तेलाची किंमत १८६.४३ रूपये प्रतिकिलो होती. परंतु २१ जून रोजी त्याचीच किंमत १८८.१४ रूपये किलोपर्यंत खाली आल्या आहेत. मोहरीच्या तेलाचा भाव १ जून रोजी १८३.६८ रूपये प्रतिकिलो तर २१ जून रोजी १८०.८५ रूपये प्रतिकिलो पर्यंत घसरण झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : यापुढे सभागृहात एकही कायदा विनाचर्चा होणार नाही – अजित पवार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -