घरदेश-विदेशकुपवाड्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

कुपवाड्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे चकमक झाली. बाबागुंड गावामध्ये रात्रभर चकमक सुरु होती या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दरम्यान, परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरु आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा बदला घेत पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले. त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. तसंच जम्मू-काश्मीरच्या काही भागात लपून बसलेले दहशतवादी जवानांवर गोळीबार करत आहेत.

- Advertisement -

अशी झाली चकमक

लष्कर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबागुंड गावामध्ये दोन ते तीन दहशतवादी लपून बसले होते. मिळालेल्या माहितीनुसार जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. लपून बसलेल्या दहतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. रात्री १ वाजल्यापासून चकमकीला सुरुवात झाली. त्यानंतर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. सीआरपीफ, जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त मोहिमेत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. ठार केलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही.

- Advertisement -

आधीच्या चकमकीत ५ जणांचा खात्मा

२७ फेब्रुवारीला शोपियां जिल्ह्यातील मामंडर येथे जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये जवानांनी दहशतवाद्यांच्याविरोधत मोहिम सुरु केली. २४ फेब्रुवारीला कुलवामाच्या तुरिगाम भागामध्ये चकमक झाली. या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होते. हे तिन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे होते. या चकमकीत डीएसपी अमित ठाकूर शहीद झाले होते.

३५ पाकिस्तानी दहशवतादी सक्रीय

पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये जवानांनी ऑपरेशन ६० सुरु केले. जवानांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास ६० दहशतवादी सक्रीय आहेत. यामधील जवळपास ३५ दहशतवादी पाकिस्तानी आहेत. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड गाजी राशिदला मारल्यानंतर जवानांनी सुरु केलेल्या मोहिमेत आता जैश-ए-मोहम्मदचा एक एक दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे. जैश-ए- मोहम्मदच्या अहमद डारने पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला सीआरपीएफ जवानांच्या बसवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -