घरदेश-विदेश'बीफ खाणं बंद केल्यास मॉब लिंचिंग थांबेल'

‘बीफ खाणं बंद केल्यास मॉब लिंचिंग थांबेल’

Subscribe

लोकांनी बीफ खाणे बंद करा मॉब लिंचिंग सारख्या घटनांना आळा बसेल असा अजब दावा इंद्रश कुमार या आरएसएस नेत्याने केला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

देशातील काही भागांमध्ये मॉब लिंचिंग सारख्या घटना वाढत आहेत. यावर आता आरएसएस नेत्याने अजब तोडगा शोधून काढला आहे. लोकांनी बीफ खाणं बंद करावे, जणेकरून मॉब लिंचिंग सारख्या घटनांना आळा बसेल असा अजब तोगडा इंद्रेश कुमार या आरएसएस नेत्याने शोधून काढला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुले चोरणारी टोळी, गो-तस्करी सारख्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यातून मॉब लिंचिंग सारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यावर आता इंद्रश कुमार या आरएसएस नेत्याने अजब तोडगा सुचवला आहे.

वाचा – धुळे मारहाण प्रकरण; आणखी एक अटके

मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ

राजस्थानमधील अलवार जिल्ह्यामध्ये गो- तस्करीच्या संशयातून रकबार खान या तरूणाची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. रकबार खान हा गो- तस्करी करत असल्याचा संशय जमावाला आला. त्यानंतर त्याची ठेचून हत्या करण्यात आली. यापूर्वी देखील अलवार जिल्ह्यामध्ये देखील अशीच घटना घडली आहे.

- Advertisement -
वाचा – मुले पळवण्याच्या अफवेवरुन गुगलच्या इंजिनिअरची हत्या

कर्नाटकमधील बिदरमध्ये देखील गुगलच्या इंजिनिअरची मुले पळवण्याची टोळी असल्याच्या संशयातून हत्या करण्यात आली होती. मोहम्मद आजम अहमद असं या तरूणाचे नाव होते. मोहम्मद आपल्या मित्रांना भेटायला बिदरमध्ये आला होता. मित्रांना भेटून झाल्यानंतर मोहम्मदच्या एका मित्राने मुलांना चॉकलेट वाटले. त्यावेळी कुणीतरी फोटो काढून मुले पळवणारी टोळी असल्याची अफवा व्हॉटसअपवर पसरवली. त्यानंतर पुढच्या गावात मोहम्मदची जमावाने ठेचून हत्या केली होती. सुदैवाने यामध्ये मित्र मात्र बचावले होते.

वाचा – जमावाकडून मारहाणीनंतर पोलिसांनी देखील ‘त्याला’ मारले

धुळ्यातील राईनपाडामध्ये देखील मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून ५ जणांची ठेचून हत्या केली होती. राईनपाडामध्ये पाच जण बाजाराच्या ठिकाणी उतरले. त्यावेळी त्यातील एक जण मुलांशी बोलत होता. स्थानिकांना ही मुले पळवणारी टोळी असल्याचा संशय आला आणि त्यांची राईनपाडाच्या ग्रामपंचायतीमध्ये ठेचून हत्या करण्यात आली.

- Advertisement -

महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश, आसाम, उत्तरप्रदेशमध्ये सध्या अनेक जणांना अफवांमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

वाचा – राजस्थानमध्ये जमावाने केली तरुणाची हत्या, गो-तस्करीचा होता संशय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -