मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये एका ब्युटी पार्लरमध्ये लग्नासाठी तयार होणाऱ्या नव वधूची रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास प्रियकराने हत्या केली. यानंतर आरोपीने तेथून पळ काढला असून दुसर्या दिवशी सोमवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याचे सांगितले जात आहे.
असा घडला प्रकार
शाजापूर येथील रहिवासी असलेल्या शानू यादवचे नागदा येथे राहणाऱ्या गौरव जैन याच्याशी रविवारी लग्न होतं. त्याच दिवशी शानू ब्युटी पार्लरमध्ये तयारीसाठी पोहोचली, तिच्या प्रियकराने ब्युटी पार्लरच्या बाहेरून फोन केला. यानंतर त्याने अचानक आत प्रवेश करून नव वधू शानूच्या गळा आवळून हत्या केली.
यानंतर वधूला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण परिसरात आरोपीचा शोध सुरू केला. जवळपासचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासले. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राम यादव याला सोमवारी अटक करण्यात आली आहे. यापूर्वी आरोपीचा साथीदार पवन पांचाळ याला रविवारी सायंकाळी अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शानूचे हे दुसरे लग्न होते, पहिले लग्न उज्जैन येथे झाले होते आणि आधीच्या पतीशी घटस्फोट झाला होता. शानू आणि आरोपी राम यांचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते, असे देखील सांगितले जात आहे.