यूनिक आयडेटिंफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (युआयडिएआय) आज मोबाईलमध्ये आधारकार्डचे हेल्पलाईन नंबर सेव्ह होण्याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. मोबाईलमध्ये सेव्ह होणाऱ्या हेल्पलाईन नंबरचा आणि युआयडिएआयशी काही संबंध नसल्याचे सांगितले आहे. आपण कुठल्याही टेलिफोन कंपनीला आधारकार्ड हेल्पलाईन नंबर यूजर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फिड करण्यास सांगितले नसल्याचेही युआयडिएआयने सांगितले आहे. गुरुवारपासून सोशल मीडियावर याविषयी चर्चा सुरु आहे.
काय सांगितले युआयडिएआयने?
युआयडिएआयने ट्विटरवर सांगितले की, यूजर्सच्या फोनमध्ये जो नंबर सेव्ह आहे, तो नंबर १८००-३००-१९४७ असा आहे. या नंबरचा युआयडिएआयशी काही संबंध नाही. यूजर्समध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी हे काम केले गेले असल्याचे समोर येत आहे. हा नंबंर लोकांच्या फोनमध्येच सेव्ह आहे. परंतु, मागील दोन वर्षांपासून हेल्पलाईन नंबर हा १९४७ असल्याचे युआयडिएआयने सांगितले आहे.
UIDAI has reiterated that it has not asked or advised anyone including any telecom service providers or mobile manufacturers or Android to include 18003001947 or 1947 in the default list of public service numbers.
#### 5/5— Aadhaar (@UIDAI) August 3, 2018
Our valid Toll free number is 1947 which is functional for more than the last two years. 4/5
— Aadhaar (@UIDAI) August 3, 2018
It is emphasised that the said 18003001947 is not a valid UIDAI Toll free number and some vested interest are trying to create unwarranted confusion in the public. 3/n
— Aadhaar (@UIDAI) August 3, 2018
… It is clarified that, UIDAI has not asked or communicated to any manufacturer or service provider for providing any such facility whatsoever. 2/n
— Aadhaar (@UIDAI) August 3, 2018
#PressStatement In the wake of some media reports on default inclusion of UIDAI’s outdated & invalid Toll free no. 1800-300-1947 in contact list of Android phones… 1/n
— Aadhaar (@UIDAI) August 3, 2018
टेलिकॉम कंपनीचे काय म्हणणे आहे?
याविषयी रिलांयस जिओचे प्रवक्त्यांनी त्यांना युजर्सच्या मोबाईलमध्ये फोन नंबर सेव्ह होण्यासंबंधी काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे. तर भारताच्या सर्वात मोठ्या टेलिफोन कंपनींपैकी एअरटेल कंपनीने याविषयी तपासणी करत असल्याचे सांगत याविषयी लवकर प्रतिक्रिया देऊ, असे सांगितले आहे.
अखिलेश यादवने भाजपवर साधला निशाना
युआयडिएआयने लोकांना जनजागृतीसाठी ट्विटरवर माहिती दिली. तर दुरीकडे अखिलेश यादवने याविषयी भाजपवर टिका केली आहे. त्यामध्ये त्यांनी इव्हीएम मशीनचा मुद्धा घेत, भाजपवर निशाना साधला आहे.
अब लोगों के ऐंड्रॉइड मोबाइल फोन की कॉन्टेक्ट लिस्ट में उनकी मर्ज़ी के बिना ‘आधार कार्ड’ की हेल्पलाइन का नम्बर अवैध रूप से सेव हो गया है. इसका मतलब कुछ लोगों ने अापके फोन और उसकी सूचनाओं तक अपनी पहुंच बना ली है. इनमें वो लोग भी होगें, जो कहते हैं कि EVM पूरी तरह सुरक्षित है.
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) August 3, 2018