घरताज्या घडामोडीwhatsapp फेक कॉल्सला आळा घालण्यासाठी भारत सरकारचे मोठं पाऊल

whatsapp फेक कॉल्सला आळा घालण्यासाठी भारत सरकारचे मोठं पाऊल

Subscribe

देशभरातील whatsapp युझर्सना फ्रॉड कॉल्स येत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या फ्रॉड कॉल्सच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे युझर्सची होणारी ही फसवणूक रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता whatsappवरून येणाऱ्या फ्रॉड कॉल्सला आळा बसणार आहे.

देशभरातील whatsapp युझर्सना फ्रॉड कॉल्स येत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या फ्रॉड कॉल्सच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे युझर्सची होणारी ही फसवणूक रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता whatsappवरून येणाऱ्या फ्रॉड कॉल्सला आळा बसणार आहे. त्यानुसार, ‘या प्रकारच्या फसवणूकीला रोखण्यासाठी whatsapp कंपनीच्या संपर्कात आहेत. मेटाची मालकी असणाऱ्या whatsappच्या अधिकाऱ्यांनी आपल्या मॅसेजिंग सर्व्हिसवरून या फ्रॉड मोबाईल क्रमांकाला डिरजिस्टर करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. या फ्रॉड कॉल्सवरून अनेकांची फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे’, असे केंद्रीय दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. (whatsapp fake calls fraud calls restricted by whatsapp in india)

भारतीय whatsapp युजर्सना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फ्रॉड कॉल्स येत होते. यामुळे युजर्सना त्रासही सहन करावा लागला होता. या फेक कॉल्सचा सुरूवातीचा क्रमांक +82 आणि +62 असा होता. या क्रमांकावरून फोन केले जात होते. मात्र हे फोन कॉल्स येण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी भारत सरकारने नेमकी कोणती कारवाई केली आहे, असं केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी बैष्णव यांना प्रश्न विचारण्यात होता. भारत सरकारच्या प्रश्नाचे उत्तर देताना अश्विनी बैष्णव यांनी सांगितले की, “whatsappच्या अधिकाऱ्यांनी आपल्या मॅसेजिंग सर्व्हिसवरून या फ्रॉड क्रमांकाला डिरसिस्टर करण्यासाठी सहमती दर्शविली आहे. भारत सरकारने फ्रॉड युजर्सना आळा घालण्यासाठी टेलिग्राम आणि इतर मॅसेजिंग प्लॅटफॉर्म सोबत चर्चा सुरू आहे”.

- Advertisement -

“मोबाईलचा दुरूपयोग करून ओळखपत्राची चोरी करणे, केवायसी आणि बँक डिटेल्स मागवून फसवणूक केली जाऊ शकते. या फसवणूकीला आळा घालण्यासाठी एका पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. भारत सरकार एका डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदे बनवण्यासाठीही काम करत आहे”, असेही अश्विनी बैष्णव यांनी सांगितले.

द्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी बैष्णव यांच्या उत्तरानंतर whatsappनेही आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानुसार, “whatsapp प्लॅटफॉर्मकडून फ्रॉड कॉलिंगची प्रकरणे दूर करण्यासाठी भारत सरकारसोबत चर्चा सुरू आहे. तसेच, वेळोवेळी युजर्सच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊ आणि त्यांना जागरूक करत राहू. यासोबत ब्लॉक आणि रिपोर्ट, टू फॅक्टर व्हेरिफिकेशनसारख्या इन बिल्ट सिक्युरिटी टूल्स ऑफर करत राहू. त्यामुळे फ्रॉडिंगला काही प्रमाणात आळा बसणार आहे”, असे सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, मेटाची मालकी असणाऱ्या whatsappच्या अधिकाऱ्यांनी आपल्या मॅसेजिंग सर्व्हिसवरून या फ्रॉड मोबाईल क्रमांकाला डिरजिस्टर करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. या फ्रॉड कॉल्सवरून अनेकांची फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे. यापूर्वीच अशा क्रमांकाच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या.


हेही वाचा – ‘सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात तुम्हाला…’, करण सजनानींचा समीर वानखेडेंबाबत मोठा गौप्यस्फोट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -