घरमनोरंजनकृष्णा अभिषेक आणि भारती सिंहनंतर चंदन प्रभाकरची देखील ‘द कपिल शर्मा’शो मधून...

कृष्णा अभिषेक आणि भारती सिंहनंतर चंदन प्रभाकरची देखील ‘द कपिल शर्मा’शो मधून एक्झिट

Subscribe

'द कपिल शर्मा' शोचे चाहते या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. या नव्या सीझनमध्ये अनेक नवे कलाकार सहभागी होणार आहेत. मात्र, आता या कार्यक्रमात चंदू ही भूमिका साकारणारा चंदन देखील या नव्या सीझनमध्ये कार्यक्रमात दिसणार नाही.

हिंदी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय रियालिटी शो ‘द कपिल शर्मा’ येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. 10 सप्टेंबर पासून हा शो टेलिव्हिजनवर दाखवला जाईल. या कार्यक्रमाचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या शोची वाट पाहत आहेत. ‘द कपिल शर्मा’ शोचा हा चौथा सीझन असून यामध्ये यावेळी अनेक नव्या कलाकारांची भर पडणार आहे. मात्र, या नव्या सीझनमध्ये कार्यक्रमातील जुने कलाकार कार्यक्रमातून बाहेर पडत असल्याची माहिती समोर येत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमातून कृष्णा अभिषेक आणि भारती सिंह बाहेर पडल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, आता या कार्यक्रमातून चंदन प्रभाकर म्हणजेच चंदू देखील बाहेर पडणार असल्याची बातमी समोर येत आहे.

द कपिल शर्मा’ मधून चंदन प्रभाकरची देखील एक्झिट
‘द कपिल शर्मा’ शोचे चाहते या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. या नव्या सीझनमध्ये अनेक नवे कलाकार सहभागी होणार आहेत. मात्र, आता या कार्यक्रमात चंदू ही भूमिका साकारणारा चंदन देखील या नव्या सीझनमध्ये कार्यक्रमात दिसणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कपिल शर्मा आणि चंदन हे खूप चांगले मित्र आहेत. चंदनने सांगितले की, त्याने हा शो सोडण्यामागे काही खास कारण नाही. त्याला यातून ब्रेक घ्यायचा आहे.

- Advertisement -

भारती देखील नसणार ‘द कपिल शर्मा’ शोचा भाग
भारती देखील हा कार्यक्रमाचा भाग नसणार हे कळताच तिचे चाहते नाराज झाले आहेत. मात्र भारतीने सांगितले की, तिला सध्या ‘द कपिल शर्मा’शो मधून दिला ब्रेक हवा आहे. कारण ती सध्या दुसऱ्या शोचे निवेदन करण्यामध्ये व्यस्त आहे.

कृष्णा अभिषेकने का सोडला कार्यक्रम?
‘द कपिल शर्मा’ या शोमध्ये कृष्णा साकारत असलेली सपनाच्या भूमिकेने सगळ्यांना खळखळून हसवले. मात्र, या नव्या पर्वात सपना ही भूमिका साकारणारे कृष्णा दिसणार नसल्याने चाहते निराश झाले आहेत. या शोमधून बाहेर पडण्यामागचे कारण कृष्णा अभिषेकने सांगितले. खरंतर, या शोच्या करारातील समस्यांमुळे त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या नव्या सीझनमध्ये अर्चना पूरन सिंह गेस्ट ऑफ ऑनरच्या खुर्चीवर विराजमान असणार आहे.


हेही वाचा :

‘द कपिल शर्मा’ शोमधून भारती सिंहची एक्झिट

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -