#MeToo चळवळीमार्फत हाऊसफूल चित्रपटाचे दिग्दर्शक साजिद खानवर अभिनेत्री रिचल व्हाईटने आरोप केले आहेत. यावर अभिनेता अक्षय कुमार याने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या आरोपानंतरप ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटाचे शूटींग थांबवले आहे. मिटूच्या भोवऱ्यात साजिदचे नाव आल्यामुळे या चित्रपटाचे शूट थांबवण्यात आले आहे.
नेमकं काय म्हणाला अक्षय कुमार ?
अक्षय कुमार म्हणाला की, ‘काल रात्रीच मी परदेशातून घरी आलो. इथे आल्यानंतर मी बातम्यांमध्ये भरपूर काही बघितलं, जे फार किळसवाणं आहे. मी हाऊसफील ४ चित्रपटाच्या निर्मात्यांना शूटिंग थांबवण्याची विनंती केली आहे. आता अशा संवेदनशील प्रकरणाकडे बघताना खमका पाऊल उचलायची गरज आहे. शिवाय, असे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांसोबत मी काम करणार नाही’.
— Akshay Kumar (@akshaykumar) October 12, 2018
ट्विंकल खन्नाच्या सांगण्यावरुन तर नाही सोडणार चित्रपट ?
तनुश्रीने नाना पाटेवर केलेल्या आरोपानंतर ट्विंकल खन्नाने ट्विटरवर तनुश्रीला पाठिंबा दर्शवला होता. त्यावेळी तनुश्रीने ट्विंकलला सांगितले की, ‘मला तुझ्या पाठिंब्याची गरज नाही. फक्त तुझ्या नवऱ्याला सांग की, नानासोबत काम करु नको’. त्यामुळे अक्षय कुमारच्या या निर्णयामागे हे देखील कारण असल्याची चर्चा रंगली आहे.