राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ठाकरे सरकारने महत्त्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. २५ सप्टेंबरला राज्यातील चित्रपटगृह २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे ठाकरे सरकारने जाहीर केले. त्यानंतर बॉलिवूडच्या अनेक चित्रपटाच्या रिलीज डेट निर्मात्यांनी जाहीर केल्यात आहेत. याच मुद्द्यावरून अभिनेत्री कंगना रनौतने बॉलिवूडवर टीकास्त्र सोडले आहे. आज, शुक्रवारी कंगनाने इन्स्टाग्रामवर स्टोअरी शेअर करून बॉलिवूडला डम्ब म्हटलं आहे.
कंगनाने इन्स्टाग्राम स्टोअरीवर लोकलमध्ये गर्दी असलेला फोटो शेअर करून लिहिले आहे की, ‘महिन्याभरापासून झोपेत असलेले बॉलिवूडचे लोकं आता अचानक रिलीज डेट जाहीर करू लागले आहेत. त्यामुळे लोकांना आता यांचे हे भंगार चित्रपट पाहण्याशिवाय पर्याय नाही.’
पुढे कंगना म्हणाली की, ‘आपल्या लोकांसाठी हा चांगला वेळ आहे. आम्हाला सोलो रिलीज मिळत नाही, आम्हाला पर्यायी स्क्रीन मिळत नाही. जरी आम्ही केले तरी, आम्हाला चांगला शो मिळत नाही. मोठे स्टुडिओ आणि माफिया यांचे मल्टीप्लेक्सवर पूर्ण नियंत्रण आहे. फक्त एका गोष्टीवर आम्हाचा विश्वास आहे, तो म्हणजे चांगला कंटेंट. अशाप्रकारे मी इथंपर्यंत पोहोचली आहे.’ कंगना बॉलिवूडच्या चित्रपटांना भंगार म्हणतं म्हणाली की, ‘अपनी तो जैसे तैसे थोडी ऐसे या वैसे कट जाएगी…आपका क्या होगा जानाबेआली.’
यापूर्वी कंगनाने ‘थलायवी’चे कौतुक न केल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीवर चांगलीच भडकली होती. कौतुक न करणाऱ्या कलाकारांना ‘बॉलिवूडचे माफिया’ असे म्हणत कंगनाने आपला संताप व्यक्त केला होता.
हेही वाचा – कन्नड अभिनेत्री सौजन्याची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये मागितली आई वडिलांची माफी