घरताज्या घडामोडीVideo :'चार दिवस सासूचे' ही मालिका का गाजली? या पिढीला मिळणार उत्तर!

Video :’चार दिवस सासूचे’ ही मालिका का गाजली? या पिढीला मिळणार उत्तर!

Subscribe

महाराष्ट्राच्या लाडक्या 'महामालिका'चा पुन्हा घ्या आनंद!

‘…… डोळ्यांमधले खारट पाणी.. गालांवरती ओघळणार्‍या मंद मंद हासूचे चार दिवस सासूचे’ … हे शब्द कानावर पडले की आजही आठवते ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाच्या मनावर अधिराज्य गाजवलेली महामालिका ‘चार दिवस सासूचे’…  सासू आणि सून! एका व्यक्तीवर प्रेम करणारे दोन जीव. मुलाचे लग्न हे आईच्या जीवनातील परमोच्च सुख. प्रत्येक आईचे तिच्या मुलांच्या लग्नाविषयी, तिच्या होणार्‍या सुनेविषयी स्वप्न असतात. ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका देखील याच कथासुत्रावर आधारलेली आहे. आशालता देशमुख यांचीदेखील त्यांच्या मुलाच्या लग्नाविषयी अशीच स्वप्न आहेत. पण जेंव्हा त्यांचा मुलगा घरात अनुराधाला सून म्हणून घेऊन येतो तेंव्हा काय होतं? आशालता देशमुख यांचे  मन ती कसे जिंकेल ? अनुराधा कसं घराला सांभाळून घेईल ? हे बघणे नक्कीच उत्सुकतेचे असणार आहे. आशालता देशमुख यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि अनुराधाची भूमिका कविता लाड – मेढेकर हिने साकारली आहे.

- Advertisement -

आशालता देशमुख हे खूप मोठ प्रस्थ आहे. घरामध्ये त्यांचा शब्द शेवटचा मानला जातो आणि त्यांनी घेतलेला निर्णय कोणी बदलू शकत नाही. रवी म्हणजेच आशालता यांचा मुलगा त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन त्यांच्या अपरोक्ष अनुराधाशी लग्न करतो आणि तिला सून म्हणून घरी आणतो. अनुराधा अत्यंत साधी, समंजस, स्वाभिमानी मुलगी. रवीने त्यांच्या आईच्या विरोधात जाऊन लग्न केले आहे ही गोष्ट अनुराधाला माहिती नाही. देशमुखांच्या घरात ती सून म्हणून येते आणि तिच्या खर्‍या प्रवासाला सुरूवात होते. “तुझं माझं” य वाटणीत, भावनांचा – नात्यांचा कस पणाला लागतो आणि उरतो तो “गृह कलह”. अनुराधा घराला कशी सांभाळते, तिच्या वाटेवर आलेल्या संकटांना ती कशी खंबीरपणे सामोरी जाते? या संघर्षात तिला रवीची साथ मिळते? हे तुम्हाला मालिका बघितल्यावरच समजणार आहे. त्यामुळे ३ ऑगस्टपासून रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर ही मालिका नक्की बघा.


हे ही वाचा – ऐश्वर्या- आराध्या बच्चनला रुग्णालयातून डिस्चार्ज, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -