घरताज्या घडामोडीएकेकाळी मंदिरा बेदीकडे दुर्लक्ष करायचे राज कौशल

एकेकाळी मंदिरा बेदीकडे दुर्लक्ष करायचे राज कौशल

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे अवघे बॉलीवूड शोकमग्न झाले असून पतीच्या अचानक झालेल्या एक्झिटने मंदिरालाही जबर धक्का बसला आहे. राज आणि मंदिरा हे बॉलीवूडमधलं हॅपी कपल म्हणून ओळखले जातात. मंदिरा आणि राज हे पती पत्नी जरी असले तरी त्यांच्यातील मैत्रीचं नातंही अनोखं होतं. त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. पण एकेकाळी राज मंदिराला टाळायचे. पण नंतर दोघांच्याही नजरा एकमेकांना शोधायला लागल्या आणि त्यांच्यातल नातं जगासमोर आलं .
मंदिरा बेदी आणि राज कौशल यांची लव्ह स्टोरी ही एखाद्या चित्रपटेतील कथेसारखीच आहे. राज आणि मंदिरा यांची पहीली भेट ही एका शूटींगच्या सेटवर झाली होती. मंदिराला पाहताच राज तिच्या प्रेमात पडले होते. पण मंदिराला ते आवडतात की नाही हे त्यांना कळतं नव्हते. यामुळे त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. यामुळे मंदिरानेही राज यांच्यापासून अंतर ठेवले. पण त्यामुळे राज अधिकच अस्वस्थ झाले. मंदिरा त्यावेळी अनेक सिरियलमध्ये काम करत होती.
तसेच ती लोकप्रियही झाली होती. त्यामुळे अनेक तरुण दिग्दर्शक, निर्माते तिच्या मागेपुढे करत. हे राज यांना आवडत नव्हते. यामुळे त्यांनी एकदा थेट मंदिराला लग्नाची मागणी घातली. याचे मंदिराला आश्चर्य वाटले. ती या दोघांची कामानिमित्त तिसरी भेट होती. पण राज यांना मंदिराला गमवायचे नव्हते.

तिचे राहणीमान, स्मार्टनेस, लोकांना आपलेसे करणारा बोलका स्वभाव राज यांना आवडला होता. अशाच लाईफ पार्टनरच्या शोधात ते होते. मंदिरा हीच आपली लाईफ पार्टनर बनू शकते असा त्यांना विश्वास होता. पण राज यांच्याबद्दल फार काही माहित नसताना त्यांना लग्नास लगेचच होकार देणे मंदिराला कठीण वाटले. पण राज तिला मनोमनी आवडायचे. शेवटी राज यांनी मंदिराजवळ तिच्या कुटुंबीयांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पण मंदिरा घाबरत होती. कारण मंदिरा एका उच्च वर्णीय कॉर्पोरेट कुटुंबीयाशी संबंधित होती. तर राज चित्रपट क्षेत्रातले होते. तेव्हा ते दिग्दर्शक मुकुल आनंद यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम करायचे. पण नंतर राज यांनी मंदिराच्या कुटुंबाला तिला आनंदीत ठेवू शकतो असे आश्वासन दिले. त्यानंतर मंदिराच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नास होकार दिला. पण आता राज यांच्या अकाली निधनाने मंदिरा पुरती कोलमडली असून दोन मुलांना सांभाळण्याची जबाबदारी तिच्या एकटीवर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -