पावसाळा जसा नवचैतन्य घेऊन येतो तसंच अनेक आजारांनाही सोबत घेऊन येतो. पावसाळ्यात विविध आजार, इन्फेक्शन्स डोकं वर काढतात. या दिवसांत खाण्या-पिण्याची काळजी न घेतल्यास किंवा बाहेरचे पदार्थ जास्त खाल्ल्यास पोटाचे विकार हमखास उद्भवतात. मात्र, काळजी करु नका. तुम्हाला पोटदुखीचा त्रास होत असेल तर हे काही पदार्थ तुम्हाला नक्कीच आराम मिळवून देतील.
१. हळद – पोटादुखी होत असल्यास एक चमचा हळद पावडर मधामध्ये मिसळून त्याचं सेवन करा. २-३ दिवस नियमितपणे याचं सेवन केल्यास तुम्हाला नक्की आराम मिळेल.
२. लवंग – लवंग शरीरातील बॅक्टेरिया संपविण्याचे काम करतो. लवंगातील औषधी गुणधर्म पोटातील जंतू मारुन पोटदुखी बरी करतात.
३. लसूण – रोज सकाळी २-३ लसूणच्या पाकळ्यांचे नियमित सेवन केल्यास पोटदुखी तसंच अन्य विकारांपासून दूर राहण्यास मदत होते.
४. हिंग – उपाशीपोटी हिंग खाण्याचे खूप फायदे असतात. मुख्यत्वे करुन हिंगाच्या नियमित सेवनामुळे गॅसेस आणि पोटदुखीची समस्या दूर होते.
५. आलं – आल्याचा एक छोटा तुकडा खाल्याने पोटाचे विकार दूर होतात. आल्यासोबत काळी मिरी घेतल्यास अधिक उत्तम.