मुंबई – राज्यात रविवारी ११७२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,११,०७८ तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १६,६५८ झाली आहे.
राज्यात रविवारी २० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, मृतांची संख्या १,४०,२१६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात १,३९९ रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत ६४,५०,५८५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२६,६७,२११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,११,०७८ (१०.५५टक्केे) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६५,८२६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.