घरताज्या घडामोडीपुण्यातील 'या' दोन धरणांत बुडून नऊ जणांचा मृत्यू

पुण्यातील ‘या’ दोन धरणांत बुडून नऊ जणांचा मृत्यू

Subscribe

पुण्यातील चसकमान आणि भाटघर या दोन धरणांत बुडून तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मृतांमध्ये 5 महिलांचा आणि 4 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पुण्याच्या पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली.

पुण्यातील चसकमान आणि भाटघर या दोन धरणांत बुडून तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मृतांमध्ये 5 महिलांचा आणि 4 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पुण्याच्या पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली. रितीन डी. डी, नव्या भोसले, परीक्षित आगरवाल आणि तनिष्का देसाई अशी चासकमान धरणात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. तसेच, भाटघर धरणात बुडून मृत्यू होणाऱ्यांमध्ये खुशबू संतोष रजपूत (19), मनिषा लखन रजपूत (20), चांदणी शक्ती राजपूत (21), पूनम संदीप रजपूत (22), मोनिका रोहित चव्हाण (23) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुंडाळवाडी परिसरात असलेल्या चासकमान धरणार गुरुवारी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास हा प्रकार समोर आला. या घटनेनंतर चौघांचेही मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आले. रितीन डीडी, नव्या भोसले, परिक्षित आगरवाल आणि तनिष्का देसाई हे सर्व जण परराज्यातून शिक्षणासाठी आले होते.

- Advertisement -

चासकमान धरणालगत असलेल्या बुरसेवाडी हद्दीतील कृष्णामूर्ती फाउंडेशनच्या सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल या शाळेची शुक्रवार २० मेपासून सुटी लागणार होती. त्यामुळे या शाळेच्या शिक्षकांसह 34 विद्यार्थी गुरूवारी संध्याकाळी 4.30 वाजता चासकमान धरणाजवळ गेले. त्यानंतर सुट्टीचा आणि धरणातील पाण्याचा आनंद घेण्यासाठी हे विद्यार्थी पाण्यात उतरले. त्यानंतर काही विद्यार्थी पोहण्याचा मोह आवरला नाही म्हणून कमरेपर्यंतच्या पाण्यात उभे राहिले. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडात असल्याची माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली. त्यावेळी उपस्थित शिक्षकांनी त्यातील काही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, चौघे जण बुडाले. त्यानंतर तेथील ग्रामस्थांच्या मदतीने चारही मुलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी चाकण येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच चौघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दुसरी घटना

- Advertisement -

एकाची दिवशी पाण्यात बुडून मृत्यू होण्याची घटना भाटघर धरणात घडली. नऱ्हे गाव हद्दीतील 5 युवतींचा भाटघर धरणामध्ये बुडून मृत्यू झाला. लंकेश रजपूत (19), मनीषा लखन रजपूत (20), चांदणी शक्ती रजपूत (21), पूनम संदीप रजपूत (22) आणि मोनिका रोहित चव्हाण (23) अशी या 5 जणींची नावे आहेत. नऱ्हे येथील मोनिका चव्हाण हिच्याकडे तिच्या नातेवाईक असलेल्या खुशबू, मनीषा, चांदणी, पूनम आल्या होत्या. भाटघर धरणावर फिरण्यासाठी गेल्या असताना दुपारी 12 वाजताच्या सुमारास त्या धरणात पोहण्यासाठी उतरल्या. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने 5 जणी पाण्यात बुडाल्या.

दुपारच्या वेळी त्याठिकाणी कोणीही नसल्याने ही घटना समजू शकली नाही. संध्याकाळी 5 वाजता एक जण धरणावर गेला असता हा प्रकार उघडकीस आला. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, राजगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, नितीन खामगळ हे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत खूशबु, चांदणी, पूनम आणि मोनिका या चौघींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून मनीषाचा शोध सुरू आहे.


हेही वाचा – Raj Thackeray Ayodhya Visit : राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित; पुण्यातील सभेतून भूमिका करणार स्पष्ट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -