मुंबई – आज विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 260 नुसार प्रस्ताव मांडला. यावेळी विरोधी पक्षांनी पूर, शेतकरी आत्महत्या आणि अतिवृष्टी विषयी भाष्य केले. याव प्रस्तावावर बोलत असताना आमदार एकनाथ खडसेयांनी शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांना खेकड्याने तिवरे धरण फोडल्याच्या घटनेवरून टोला हानला. यावर तानाजी सावंत यांनी आज स्पष्टीकरण दिले.
काय म्हणाले तानाजी सावंत –
जसा उन्हाळा वाढत जातो तशी खेड्याच्या प्रजाती त्यांची पिल्ले ओल असेल तशी खाली खाली होल तयार करत जातात. उन्हाळा जितका तीव्र तितके ते खोलपर्यंत जातात. पाऊस काय सांगून येत नाही. पाणी आल्या बरोबर ते पाणी त्या होलात जाऊन पाण्याच्या प्रेशने तो पाझर लावाचा बांध फुटतो हे तांत्रीक उदाहरण आहे. हे मेरीच्या आहवालात आहे.
मी त्या ठीकाणी असे होऊशकते तीवऱ्याचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल असे मी म्हंटले होते.
दिले दुसरेही उदाहरण –