घरमहाराष्ट्रभाजपाबाबत अभिनेते Nana Patekar यांनी केले भाकीत, म्हणाले - "देशाकडे दुसरा पर्याय...

भाजपाबाबत अभिनेते Nana Patekar यांनी केले भाकीत, म्हणाले – “देशाकडे दुसरा पर्याय नाही, म्हणून…”

Subscribe

हिंदी आणि मराठी सृष्टीतील अभिनेते नाना पाटेकर यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठे भाकीत केले आहे. देशाला भाजपाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांनाच लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. ज्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष हे लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. कालच (ता. 25 डिसेंबर) महाराष्ट्र राज्याशी संबंधीत सी-व्होटर आणि एबीपीचा सर्वे अहवाल समोर आला आहे. या अहवालात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के मते अधिक मिळणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे. ज्यामुळे आता याबाबत सर्वांनीच आपले मत व्यक्त करण्यास सुरुवात केली. राजकारण आणि सिनेसृष्टीतील नेते यांचा फारसा संबंध नसली तरी काही अभिनेते, अभिनेत्री राजकारणात रस घेताना पाहायला मिळतात. ज्यामुळे ते याबाबत आपले मत व्यक्त करताना दिसत असतात. अशातच आता हिंदी आणि मराठी सृष्टीतील अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत भाकीत केले आहे. (Actor Nana Patekar predicted about BJP)

हेही वाचा… Ambadas Danve : आत्महत्यामुक्त शेतकऱ्यांच्या घोषणा हवेतच विरल्या; दानवेंची सरकारवर टीका

- Advertisement -

नाना पाटेकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. ज्यावेळी त्यांनी निवडणुका आणि देशाचे राजकारण याबाबत वक्तव्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत तुम्हाला नेमके काय वाटते? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. ज्यावेळी याबाबत बोलताना ते म्हणाले की, आगामी निवडणुकीत भाजपाला 350 ते 375 जागा मिळतील आणि पुन्हा भाजपा सत्तेत येईल. भाजपा देशात उत्तम काम करत आहे. त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपा पक्षाला नक्कीच यश मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील. देशाकडे भाजपाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मोठे वक्तव्य नाना पाटेकर यांनी केले आहे. ज्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पाटेकर यांनी केलेले भाकीत खरे ठरते की नाही, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सध्या राजकारणात याबाबतची जोरदार चर्चा रंगली आहे.

नाना पाटेकर हे नेहमीच त्यांच्या विधानामुळे, त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत असतात. हल्लीच काही दिवसांपूर्वी त्यांनी एका मुलाला डोक्यात टपली मारल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ज्यानंतर त्यांच्यावर प्रेक्षकांनी टीकेची झोड उठवली. या घटनेनंतर नानांनी सोशल मीडियावर जाहीररित्या माफी मागितली. तर सिनेमाचे शूटिंग सुरू असताना ती घटना घडल्याचेही नानांकडून सांगण्यात आले. पण आता त्यांनी भाजपाबाबत केलेल्या भाकीतामुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -