घरताज्या घडामोडीबारामतीच्या जवळ असलेल्या नेत्यांची इंदिरा गांधीवर टीका - आशिष शेलार

बारामतीच्या जवळ असलेल्या नेत्यांची इंदिरा गांधीवर टीका – आशिष शेलार

Subscribe

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बीड येथे बोलताना स्व. इंदिरा गांधी यांच्यावर केलेल्या भाष्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये ठिणगी पडली आहे. आता या आगीत भाजपनेते आशिष शेलार यांनी देखील तेल ओतले आहे. स्व. इंदिरा गांधी यांच्यावर टीका करणारे दोन्ही नेते बारामतीच्या साहेबांच्या जवळचे असून इंदिरा गांधी यांच्यावर टिका करण्याचा किमान समान कार्यक्रम ठरला आहे का? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

आशिष शेलार यांनी एका व्हिडिओद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांचे संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे सांगितले होते. तर सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील इंदिरा गांधींवर टीका केली आहे. इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटला, असं आव्हाड खरंतर खरंच बोलले होते. हे दोन्ही नेते बारामतीच्या साहेबांच्या जवळचे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात इंदिरा गांधीवर टीका करणे हा कार्यक्रम ठरला आहे का? असा प्रश्न मी आशिष शेलार यांनी सरकारला विचारला आहे.

- Advertisement -

इंदिरा गांधीवर टीका करण्याचा समान कार्यक्रम

स्व. इंदिरा गांधीवर टीका करण्याचा समान कार्यक्रम आहे का? – आशिष शेलार

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಜನವರಿ 30, 2020

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -