Atal Setu शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या सागरी सेतूवरून चार चाकी वाहनांना वेगाने धावता येणार आहे. म्हणजे या चारचाकी वाहनांना ताशी 100 किलोमीटरच्या वेगाने जाता येणार आहे. तर मोटारबाईक, ऑटोरिक्शा आणि ट्रॅक्टर आदी वाहनांना या सागरी सेतूवरून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
हा महामार्ग शिवडी येथून थेट सुद्रमार्गे न्हावा शेवापर्यंत जातो. 22 किमीचा अटल सेतू असून त्यातील 16..80 किमी रस्ता समुद्रातून आहे. हा सेतू भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पूल आहे. तर जगात हा सेतू 12 व्या स्थानी आहे. 18 हजार कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईसह, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटांवर आणणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी मैलाचा दगड म्हणजे हा प्रकल्प असेल. मात्र हा पुल वाहतुकीसाठी कधी खुला करण्यात येईल याची सर्वांचा उस्तुकता लागली आहे.
शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू अखेर वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. आजपासून (ता.13 जानेवारी) हा अटल सेतू सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. शनिवारी सकाळपासूनच अटल सेतूवर वाहतूक सुरू झाली आहे. यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी अटल सेतूवरून प्रवास करण्यास सुरुवात केली.
कसा आहे पूल?
Mumbai Trans Harbour Link या पुलाची एकूण लांबी 21.8 किमी आहे.
समुद्रावरील लांबी 16.50 किमी आहे आणि जमिनीवरील भाग 5.5 किमी आहे.
या सी लिंकमध्ये दोन्ही बाजूला 6-लेन (3+3 लेन) महामार्ग+1 आपत्कालीन लेन आहे.
पुलावरून प्रवास करण्यासाठी 250 रुपये टोल निश्चित करण्यात आला आहे. तर रिटर्न प्रवासासाठी 375 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई-गोवा हायवेशी वेगवान दळवळण शक्य होईल.
मुंबईतील शिवडी, शिवाजी-नगर आणि जासई येथे SH-54 आणि NH-348 वर चिर्ले येथे इंटरचेंज आहेत.
90 मी ते 180 मीटर लांबीचे 7 ओएसडी (ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक) स्पॅन आहेत जे भारतात प्रथमच पुलावर वापरले गेले आहेत.
मुंबई-नवी मुंबईवरून पनवेल, अलिबाग, पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास या मार्गामुळे सोपा होणार आहे.
इंधनाची बचत होईल. वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच नवीन गुंतवणूक होऊन रोजगार वाढेल.
ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातला पहिलाच रस्ता
प्रत्येक 100 मीटरवर अद्ययावत सीसीटिव्ही कॅमेरे बसलेले आहेत. एकूण 130 सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
सध्या फ्री वे आणि शिवडी येथून या पुलावर जाता येते. भविष्यात कोस्टल रोडला देखील जोडण्यात येईल.
रस्त्याचे बांधकाम उत्कृष्ठ दर्जाचे आहे. प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना उत्तम आहेत.
फ्लेमिंगो जवळून जात असलेल्या पुलाच्या भागाला साऊंड बॅरियर लावण्यात आले आहेत. त्यामुळे फ्लेमिंगो आणि इतर कांदळवनातील वन्य जीवांना त्रास कमी होईल.
विशिष्ट अंतरावर स्पिडोमीटर्स लावण्यात आल्याने वाहनाचा वेग आणि दिलेली मर्यादा लक्षात येते.
पुलावर काही ठिकाणी 100 किमी प्रतितास तर काही ठिकाणी 80 आणि 60 किमी प्रतितास अशी वेग मर्यादा आहे.
या पुलावरून प्रवास करताना आपल्याला टोल भरण्यासाठी थांबावे लागणार नाही. ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातला पहिलाच रस्ता आहे.