घरमहाराष्ट्रकोरोना काळातल्या बैलगाडा शर्यतीतले सर्व गुन्हे मागे घेणार - दिलीप वळसे पाटील

कोरोना काळातल्या बैलगाडा शर्यतीतले सर्व गुन्हे मागे घेणार – दिलीप वळसे पाटील

Subscribe

कोरोना काळात बैलगाडा शर्यतीमुळे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना कोरोना काळातल्या बैलगाडा शर्यतीतले सर्व गुन्हे मागे घेणार असल्याचं सागितलं.

महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात बैलगाडा शर्यतीवर बंदी होती; त्या काळात शर्यतींचं आयोजन केलं होतं, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. ते गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. महाराष्ट्रातील गुन्ह्यांची माहिती मागवली आहे. एक प्रक्रिया पूर्ण करुन सर्व गुन्हे मागे घेतले जातील, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

- Advertisement -

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे

गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (२ एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

मात्र कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.
गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलीस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -