घरमहाराष्ट्रराज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळात फडणवीसांनीच नेतृत्व करायला हवे, भाजप प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळात फडणवीसांनीच नेतृत्व करायला हवे, भाजप प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य

Subscribe

आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे की, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळात दवेंद्र फडणवीस यांनीच नेतृत्व केले पाहिजे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यामुले भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून नाराजी असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. या आधी भाजपच्या काही नेत्यांनी फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हायला हवे होते, असे बोलून दाखवले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे काय म्हणाले –

- Advertisement -

पुढच्या काळात मी मुख्यमंत्री झालो पहिजे, असा काही जणांनी उल्लेख येथे केला. पण कर्तृत्ववान अष्टपैलू असे फडणवीस हे माझ्या पाठीशी उभे राहिले. मला त्यांनी उर्जा दिली. आज आपले कर्तव्य आहे की, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळात फडणवीस यांनीच नेतृत्व करायला हवे. मी जबाबदारीने सांगतो की जात, धर्म पंथाच्या बाहेर जाऊन एक निष्ठावान आणि सक्षम कार्यकर्ते हे फडणवीस आहेत. त्यांच्या नेतृत्वाला सलामच करायला पाहिजे.

1992 मध्ये मी कुऱ्हाडी गावचा शाखाध्यक्ष होतो. मला कधी वाटलही नव्हते की प्रदेशाध्यक्ष होईल म्हणून. तेव्हा खूप संघर्ष होता, प्रचंड ताणतणाव होता. मला अभिमान आहे की पक्षाने मला आमदार, पालकमंत्रीही केले. आज जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. 155 देशांनी मोदींचे नेतृत्व स्वीकारले. देशाच्या पंतप्रधानाचा इतिहास बघा, चहावाला होते एका गावात. युगपुरुष होतील असे त्यांचे कर्तृत्व आहे. ते म्हणाले, जगातले 70 टक्के देश म्हातारे होणार. संस्कार, संस्कृती असणारा असा आपला देश, युवापिढीचे नेतृत्व करणार आहे. मला ही जाणीव आहे की मला प्रदेशाध्यक्ष केले म्हणजे माझ्यावर जबाबदारी खूप आहे. 45 प्लस खासदार आम्हाला द्यावे लागतील महाराष्ट्रातून. कोरोना काळात खूप मोठे काम केले, लस आणली. तुमच्या आमच्या तोंडावरचे मास्क काढण्याचे काम मोदींनी केले. मी या दोन महिन्यात महाराष्ट्रात फिरणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -