घरमहाराष्ट्रनववर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तीचा निर्धार करा, मुख्यमंत्र्यांचं जनतेसाठी खुलं पत्र

नववर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तीचा निर्धार करा, मुख्यमंत्र्यांचं जनतेसाठी खुलं पत्र

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नववर्ष आरोग्यदायी होण्यासठी स्वयंशिस्तीचा निर्धार करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी करोनाविरुद्धचा लढा महाराष्ट्र आतापर्यंत कसा लढला हे सांगण्याबरोबरच कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि त्यासाठी आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबर इतरांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्याचा संकल्प आपण नव्या वर्षासाठी करुया, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. शिवाय, मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर, परिचारीका, पोलीस, शासकीय आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना तसंच स्वयंसेवकांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हटलंय पत्रात?

कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि त्यासाठी आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबर इतरांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्याचा संकल्प आपण नव्या वर्षासाठी करुया. गेले वर्षभर संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राने देखील लोकांच्या सहभागाने आणि अतिशय जबाबदारीने ही लढाई लढली आहे. आज आपण विविध मार्गांनी कोरोना विषाणूचा संसर्ग काहीसा कमी करत आणला असला तरी, येणाऱ्या वर्षात बेसावध न राहता आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

- Advertisement -

एक नवीन जीवनपद्धती आपण शिकलो आहोत. यामध्ये मास्क घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं, हात स्वच्छ ठेवणं यासारख्या त्रिसूत्रीचा अवलंबं आपण करत आहेत. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षणासारख्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण पद्धतीने उपयोग करत आहोत. पुढील काळ कसा असेल याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. लस आपल्यापर्यंत येईल आणि ती सर्वांना मिळेल हा एक भाग झाला पण दरम्यान कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

cm uddhav thackeray letter

- Advertisement -

आपण पुनश्च: हरी ओम म्हणत सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु करत आहोत. आता आपल्याला मागे परतायचं नाही. कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा आता स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. विशेषत: नवीन पिढीवर याची जास्त जबाबदारी आहे. व्या वर्षात आपण जबाबदार नागरिक म्हणून सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार मनोमन करणं गरजेचं आहे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. आपली आव्हाने कमी होणार नाहीत. शासन यंत्रणा कृतीशील आणि गतीमान आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे नेहमीच येतात परंतू त्याचा सामना सावधपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करुयात असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

सध्याच्या आव्हानात्मक परिस्थीचा अतिशय जिद्धीने सामना करती असलेल्या डॉक्टर, परिचारीका, पोलीस, शासकीय आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना तसेच स्वयंसेवकांना नव वर्षाच्या मन:पुर्वक शुभेच्छा, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्राचा शेवट केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -