घरCORONA UPDATEदिलासादायक: मुंबईत कोरोना रुग्णावर केलेली प्लाझ्मा थेरपी यशस्वी - राजेश टोपे

दिलासादायक: मुंबईत कोरोना रुग्णावर केलेली प्लाझ्मा थेरपी यशस्वी – राजेश टोपे

Subscribe

नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी कोरोनाच्या उपाययोजनांसंदर्भात बैठक पार पडली. यावेळी टोपेंनी ही माहिती दिली.

मुंबईत कोरोना रुग्णावर करण्यात आलेली पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झालेली आहे. मुंबईमधील लिलावती रुग्णालयात करोना रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरपी करण्यात आली होती. दरम्यान, या थेरपीला यश आलं आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी कोरोनाच्या उपाययोजनांसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, कृषीमंत्री दादाजी भुसे, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्यधिकारी व इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

“लिलावती रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेली होता. या थेरपीला यश मिळालेलं आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मला ही थेरपी यशस्वी झाली असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, आता नायर रुग्णालयात दुसरी थेरपी केली जाणार आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनीही आपल्याला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पण ही थेरपी करताना योग्य मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. त्यांचं पालन केलं तरच थेरपी यशस्वी होत असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. पुण्यातही हा प्रयोग करणं शक्य आहे,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं. शिवाय, मालेगावमधील परिस्थितीवर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, “दाटीवाटीची जागा असल्याने अनेक ठिकाणी लोकांना घरात क्वारंटाईन होणं शक्य नाही. पण शक्य आहे तिथे संस्थात्मक क्वारंटाईन केलं जावं अशी सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: चिंपांजीमधील एडिनोविषाणू कोरोनाला हरवणार


“२०० खाटांचं रुग्णालय करोनासाठी वापरलं जाणार आहे. तसा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. डॉक्टर, नर्स जे पोस्टिंग केल्यानंतरही गेलेले नाहीत त्यांना २४ तासांचा मुदत दिलेली आहे. जर ते जॉईन झाले नाहीत तर निलंबन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. जायचंच नाही हा दृष्टीकोन योग्य नाही,” असं राजेश टोपे म्हणाले.

- Advertisement -

“अज्ञानीपणामुळेही अनेकदा मृत्यू होत आहेत. त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. जे १२ मृत्यू झाले आहेत त्यांचा दाखल झाल्यानंतर २४ तासात मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णालयांना सरकार पीपीई किट देणार आहे. खासगी रुग्णालयांनी सहकार्य करण्यास नकार दिला तर कठोर कारवाई करावी लागेल. मालेगाव मिशन आपल्याला यशस्वी करायचं आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -