घरमहाराष्ट्रपावसाळी आजारांपासून लहान मुलांना सांभाळा; तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला

पावसाळी आजारांपासून लहान मुलांना सांभाळा; तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला

Subscribe

मुंबई सारख्या शहरात पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण तयार होतं आणि त्याकारणाने या दिवसात साथीच्या रोगांमध्ये वाढ होते. यापासून लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी मुलांना सांभाळा असा सल्ला तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

पहिल्या पावसात मनसोक्त खेळणाऱ्या लहान मुलांना त्यानंतर दोनच दिवसांत सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब अशा तक्रारी सुरू होतात. अनेकदा हा विषाणूजन्य ताप असतो. पण, वेळीच लक्ष दिले नाही, तर मुलांच्या आजारात गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी लहान मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे. पालकांनी घरात डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी ठराविक उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. मुंबई सारख्या शहरात पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण तयार होतं आणि त्याकारणाने या दिवसात साथीच्या रोगांमध्ये वाढ होते. यापासून लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी तज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करून वेळीच तपासणी करणे आवश्यक आहे.

स्वच्छतेबाबत विशेष खबरदारी

जागोजागी पाणी साचते. पाण्याची डबकी तयार होतात. त्यामुळे चिलटे, माशा यांचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे पावसाळी आजार वाढतात. पाण्यातून मुलांना यावेळी संसर्ग होण्याची भीती असते. नुकतीच रांगू लागलेली बाळे पटकन कोणत्याही वस्तू तोंडात टाकतात. त्यामुळे त्यातून विषाणूसंसर्ग होऊ शकतो.

- Advertisement -

पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून डेंग्यू, मलेरिया, दंत, टाइफॉइड आणि श्वसनासंबंधित विकारांबाबत तक्रारींनी पिडीत बालक हॉस्पिटलकडे धाव घेत आहे. घशांसंबधी विकार तसंच ताप असल्यास मुलांना घरगुती उपचार न करता तज्ञ डॉक्टरांकडे घेऊन जावे. अनेक आजार हे अस्वच्छतेमुळे उद्भवणारे असून घरात तसंच आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखणे आवश्यक आहे.  डॉ. शकुंतला प्रभु; बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल मेडिकल डायरेक्टर

डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी त्यांची घरं तसंच आजूबाजूच्या परिसरात पाणी साचणार नाही याची विशेष खबरदारी घ्यावी. साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. मुलांना पोषक आहार देणं ज्यामध्ये व्हिटॅमिन, खनिज तसंच एन्टीऑक्सीडन्ट्सचा समावेश असणारे बाहेरील अन्नपदार्थांचे सेवन न करता फळ तसंच भाज्यांचा आहारात समावेश केल्यास मुलांना आजारांपासून दूर ठेवता येईल. बाजारातील फळे आणि भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून मगच वापरात आणाव्यात.  – डॉ. सुरेश बिराजदार; मदरहुड हास्पिटल

- Advertisement -

हेही वाचा – सातपूर परिसरात डेंग्युच्या संशयित रुग्णांत वाढ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -