घरमहाराष्ट्र...अस्थी ‘मातोश्री’वर पाठवू

…अस्थी ‘मातोश्री’वर पाठवू

Subscribe

‘त्या’ शेतकर्‍याच्या नातलगांचा इशारा

भावाने आत्महत्या केली. चार दिवस उलटूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊनही काही झाले नाही. सर्वांना निवडणूक महत्त्वाची वाटते. याप्रकरणी जर प्रशासनाने कारवाई केली नाही तर भावाच्या अस्थी ‘मातोश्री’वर आणि जिल्हाधिकार्‍यांना पाठविणार असल्याचा इशारा आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबियांनी दिला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तळवडे येथील दिलीप ढवळे या शेतकर्‍याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आपली आर्थिक फसवणूक केल्याने मानहानी सहन करावी लागत असल्याने त्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले होते.

- Advertisement -

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यात ही आत्महत्येची घटना समोर आली. त्यानंतर मराठवाड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या अनेक ठिकाणी प्रचार सभा झाल्या. परंतु त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही.

यासंदर्भात दिलीप ढवळे यांचे भाऊ राज ढवळे म्हणाले की, आत्महत्या केल्यानंतर अद्याप गुन्हा दाखल केला नाही. मृतदेह गुन्हा दाखल होईपर्यंत ताब्यात न घेण्याचा सल्ला नातेवाइकांनी दिला होता. मात्र निवडणुका सुरू असल्याने अधिकार्‍यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही हे टाळले. परंतु गेल्या चार दिवसांपासून पोलीस ठाण्यात चकरा मारूनही कोणीच दखल घेतली नाही. सोमवारी पोलीस अधीक्षकांनाही भेटलो. त्यांना कारवाईची विनंती केली. कारवाईबाबत अशीच चालढकल होणार असेल तर भावाच्या अस्थी पोलीस ठाण्यात विसर्जित करून त्या ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे आणि जिल्हाधिकारी यांना पाठवू, असा इशारा त्यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -