घरताज्या घडामोडीपवारांचे राजकारण म्हणजे गद्दारी आणि.., आमदार गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

पवारांचे राजकारण म्हणजे गद्दारी आणि.., आमदार गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Subscribe

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत खुलासा केल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना नॉटी बॉय म्हटलं आहे. दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या राजकारणावर भाष्य करत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी १५ दिवसांपूर्वी पवारांच्या खेळीनं पहाटेचा शपथविधी झाल्याचं सांगितलं होतं. परंतु शरद पवारांचं राजकारण गद्दारी आणि पाठीत खंजीर खुपसल्याशिवाय होत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सरकार मजबूत आहे आणि शिल्लक असलेली माणसं टिकवण्यासाठी काहींना सरकार कोसळणार असल्याची विधानं करावी लागतात, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर निशाणा साधला.

- Advertisement -

विरोधी पक्षात असताना एकही आमचा आमदार फुटत नाही. पवारांची सत्ता गेल्यानंतर आमदार लगेच पळायला लागतात. मुख्यमंत्री असणाऱ्या शिवसेनेचे ५० आमदार गेले. अडीच वर्षात आमचा एकही आमदार फुटला नाही. कारण आम्ही विचाराने काम करतोय. आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दबावाखाली येऊन पक्षांतर करतोय, असं म्हटलं नाही. आमचं सरकार एकदम मजबूत आहे, असं पडळकर म्हणाले.

शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण झालेल्या नोटा आहेत. चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत. पवारांचा चेहरा आधीच विश्वासघाताने, गद्दारीने आणि पाठीत खंजीर खुपसण्यानं कालवंडलेला होता. मागच्या महिन्यात त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यावर शिक्कामोर्तब केले होते, असंही पडळकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : खिडकीतली जागा बदलून वर्गातील मध्यभागी बसवायला हवं.., फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सुळेंचा टोला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -