घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळे हटवण्याची हिम्मतच कशी...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळे हटवण्याची हिम्मतच कशी झाली; छगन भुजबळ संतापले

Subscribe

नाशिक : रविवारी (दि.२८) दिल्लीतील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र सरकारच्या वतीने वि. दा. सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता अहिल्याबाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला केले गेले. या कृतीमुळे महाराष्ट्रात विविध घटकातून तीव्र भावना उमटत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आ. छगन भुजबळ यांनी देखील याबाबत संताप व्यक्त केला आहे. भुजबळ म्हणाले, महाराष्ट्रात सदनात जयंती साजरी करायला माझा विरोध नाही. परंतु याठिकाणी शिवराज मुद्रा लावली आहे ती झाकून सावरकर यांचा पुतळा लावला गेला. तिथेच छोट्या चौकात दोन पुतळे आहे त्यात राजमाता अहिल्याबाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला केले गेले. ही घटना मनाला दुःख देणारी आहे.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सदनात मोठ्या हॉलची व्यवस्था असतांना कार्यक्रम तिथे का घेण्यात आला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे व हा मूर्खपणा कुणी केला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पुतळे हटविण्याचे काम का केले जाणीवपूर्वक हे केले का हे शोधले पाहिजे व त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

देशात लोकतंत्र की मनुतंत्र?

नवीन संसद भवन उद्घाटन सोहळ्याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, या सोहळ्याबद्दल अतिशय वाईट वाटले. पहिल्या संसद भवनाच्या वेळी स्वातंत्र्याचे लढव्यये होते. आता मात्र उघड बंब माणसं होती. त्यांच्या मध्येच पंतप्रधान मोदी उभे होते. या सोहळ्यावर पवार साहेब म्हणाले ते खरे आहे. या धर्मकांड मध्ये सहभागी झालो नाही याचा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशात लोकशाही व्यवस्था आहे, राजव्यवस्था नाही. लोकशाहीत जनता राजा आहे. आता मात्र लोकतंत्र आहे की मनुतंत्र आहे ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित करत मोदींनी जे केले ते मनाला वेदना देणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असा सोहळा राम मंदिर शिव मंदिरात ठीक होता पण हे लोकशाहीच्या मंदिरात अपेक्षित नव्हता अशी टीका त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -