घरमहाराष्ट्रतावडेंनी दु:खाचाही विनोद केला : आव्हाडांचा पलटवार!

तावडेंनी दु:खाचाही विनोद केला : आव्हाडांचा पलटवार!

Subscribe

राष्ट्रवादीचे आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी विनोद तावडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आव्हाडांच्या 'खेकडा' आंदोलनावर तावडे यांनी टीका केली होती. त्याच टीकेला प्रत्युत्तर आव्हाड यांनी दिले आहे.

‘तिवरे धरण दुर्घटनेने संपूर्ण कोकण दु:ख सागरात बुडालेला असताना दुसरीकडे कोकणपूत्र म्हणविणारे विनोद तावडे हे उद्यानाच्या कार्यक्रमात मश्गुल होते. त्यांच्यातील असंवेदनशीलतेचे प्रदर्शन महाराष्ट्राने पाहिले. शिक्षणाचा विनोद केलेल्या या माणसाने असा कार्यक्रम आयोजित करुन जनतेच्या दु:खाचाही ‘विनोद’ केला आहे’, असा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यामुळे तावडेंना आमच्यावर टीका करण्याचा नैतीक अधिकार उरलेला नाही. तावडेंनी आधी कोकणवासियांची माफी मागावी, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या ’खेकडा’ आंदोलनावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आव्हाड हे स्टंट करीत असल्याची टीका केली हेाती.

नेमके काय म्हणाले जिंतेद्र आव्हाड?

जितेंद्र आव्हाड यांनी विनोद तावडेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘विनोद तावडे हे आपण कोकणी असल्याचे सांगत आहेत. मात्र, आपला कोकणी माणूस तिवरे धरण फुटल्यानंतर निर्माण झालेल्या पुरामध्ये वाहून गेल्याचे साधे सोयसुतकही त्यांना राहिलेले नाही. एकीकडे तिवरे पंचक्रोशीत शोककळा पसरलेली असताना विनोद तावडे हे अशा कार्यक्रमाचे आयोजनच कसे काय करतात? दोन दिवस हा उद्यान उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलला असता तर अवकळा आली नसती. धरणफुटीत दगावलेल्यांच्या चिता विझलेल्या नसताना आणि काहींच्या चिता तर पेटलेल्या नसताना; बेपत्ता असलेले अनेकजण सापडलेले नसतानाही  स्वत:ची ‘शान’ दाखवण्यासाठी विनोद तावडे यांनी हा बेशरमपणा केला आहे. हा बेरशरमपणा करतानाही त्यांच्या तोंडावर आनंद ओसंडून वाहाताना दिसत होता. संपूर्ण  कोकण दु:खात अश्रू ढाळत असताना तावडेंना आनंद साजरा करण्याचे धैर्य कुठून आले?’ त्याचबरोबर ‘शिक्षणाचा विनोद केलेल्या या माणसाने आता असा कार्यक्रम आयोजित करुन जनतेच्या दु:खाचाही ‘विनोद’ केला आहे. तिवरे-भेंदेवाडीतील लोकांच्या पोटात अन्नाचा कण नसताना विनोद तावडे हे आनंदामध्ये नाश्त्यावर ताव मारीत होते. तेथील लोक पाण्यासाठी मोताद झालेले असताना हेच तावडे उद्घाटनाच्या कार्यक्रमात चहा-कॉफी-कोल्ड्रींगचे प्याले रिचवत होते. भेंदेवाडीतील बांधव स्मशानात असताना या सरकारमधील मंत्री उद्यानात रममान झाले होते. इतके असंवेदनशील मंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिलेले नाहीत’, अशा शब्दांत आव्हाड यांनी टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कुमारस्वामींची खुर्ची धोक्यात; कर्नाटकात ११ आमदरांचा राजीनामा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -