घरमहाराष्ट्रफडणवीसांना फार कंठ फुटलाय, आधी ड्रग्जच्या रावणाला संपवा; राऊत संतापले

फडणवीसांना फार कंठ फुटलाय, आधी ड्रग्जच्या रावणाला संपवा; राऊत संतापले

Subscribe

देश का बच्चा बच्चा श्रीराम बोलेगा, मग कधी बोलत नव्हता का? जो बच्चा श्रीराम म्हणतोय, त्याच्यापर्यंत ड्रग्ज पोहोचतंय. त्याचा बंदोबस्त करा.

मुंबई: राज्यात सध्या ललित पाटील प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. तसंच, दुसरीकडे ललित पाटील प्रकरणात अनेक नवनवे खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. अशातच आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना ड्रग्ज प्रकरणावरून प्रश्न विचारला असता ते संतापले. त्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीसांना हल्ली फार कंठ फुटला आहे. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलणार, असं ते म्हणतात. परंतु त्याआधी त्यांनी राज्यातून ड्रग्जच्या रावणाला बाहेर काढावं, असं राऊत म्हणाले. (Lalit Drugs Case Devendra Fadnavis should stopped this Sanjay Raut was furious)

श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करतील

संजय राऊतांनी यावेळी फडणवीसांच्या एका विधानाचा संदर्भ घेऊन त्यांना लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांना सध्या फार कंठ फुटला आहे. ते एका गरब्यात गेले आणि त्यांनी गर्जना केली की देश का बच्चा बच्चा श्रीराम बोलेगा, मग कधी बोलत नव्हता का? जो बच्चा श्रीराम म्हणतोय, त्याच्यापर्यंत ड्रग्ज पोहोचतंय. त्याचा बंदोबस्त करा. पंचवटी रामाचंच ना? त्या नाशिकमधील पंचवटीत ड्रग्जचा सर्वात जास्त व्यापार सुरू आहे. हे फडणवीसांना माहिती आहे का? पैठण तीर्थक्षेत्र आहे. तिथे काल अडीचशे-तीनशे कोटींचं ड्रग्ज सापडलं. आपका ड्रग्ज लेके बच्चा बच्चा श्रीराम नहीं बोलेगा. तुरुंगातून ड्रग्जमाफियांना पळवून लावलं जातंय आणि तुम्ही काय सांगताय की जय श्री रामाच्या घोषणा द्या. श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल, असं राऊतांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राला केनिया, नायजेरियाच्या दिशेनं नेताय काय?

हजारो कोटींच ड्रग्ज गुजरातमधून महाराष्ट्रात कसं येतं? त्यांना कुणाचं संरक्षण आहे? अर्धा ग्रॅम ड्रग्ज सापडल्यावर हे आकांडतांडव करतात. पण देवेंद्र फडणवीस तुम्ही असून इथे 500 कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलं. जे यातून सुटलं, ते मुलांकडे, कॉलेजमध्ये, महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं. उडता पंजाब, उडता गुजरात झाल्यानंतर आता महाराष्ट्रला केनिया, नायजेरियाच्या दिशेनं घेऊन जात आहात का? इथून मोठमोठे उद्योगधंदे गुजरातला गेली. तिथून काय येतंय? तर ड्रग्ज. या ड्रग्जचा रावण महाराष्ट्रातून संपवायला हवा, आम्ही ते करू, जे होईल ते बघू, असं संजय राऊत म्हणाले.

(हेही वाचा: Dasara Melava: शिंदे बरसणार; आझाद मैदानावरून या मुद्यांवर बोलणार?)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -