घरताज्या घडामोडीमिलिंद म्हैसकर, अश्विनी जोशींसह सात IAS अधिकार्‍यांच्या बदल्या

मिलिंद म्हैसकर, अश्विनी जोशींसह सात IAS अधिकार्‍यांच्या बदल्या

Subscribe

कोरोना संकटात राज्य सरकारने आणखी सातआयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मुंबई म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह
सात आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात शिर्डी येथील साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून के.एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने सात अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. यात मुंबई म्हाडाच्या उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची वन विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांची महाजेनकोच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मुख्य सचिवांच्या कार्यालयात उप सचिवपदी बदली करण्यात आली आहे. जलस्वराज्य प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक ए.ए.गुल्हाणे यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. शिर्डी येथील साई संस्थानच्या सीईओपदी सरकारकडून के.एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक डॉ अश्विनी जोशी यांची बदली करण्यात आली असून त्यांना तत्काळ पदमुक्त केले आहे. मात्र त्यांना नवीन पोस्टिंग देण्यात आलेले नाही. यापूर्वीच पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पीएमओमध्ये उपसचिव म्हणून बदली करण्यात आलेली आहे.

पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती नाहीच?

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली झाली आहे. राम यांच्या बदलीमुळे पुणे जिल्हाधिकारी पद रिक्त झाले असून, पदाचा अतिरिक्त पदभार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -