घरमहाराष्ट्र'ज्यांना हायकोर्टात जायचं त्यांनी खुशाल जावं,' अंजली दमानियांना भुजबळांचं उत्तर

‘ज्यांना हायकोर्टात जायचं त्यांनी खुशाल जावं,’ अंजली दमानियांना भुजबळांचं उत्तर

Subscribe

अन्न व नगारी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी (Maharashtra Sadan Scam Case) मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचं स्पष्ट केलं. यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून ज्यांना उच्च न्यायालयात जायचं आहे त्यांनी खुशाल जावं, असं म्हटलं आहे.

उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय कुठे जायचं तिथे त्यांनी खुशाल जावं. पण मुळात या केसची एक एक गोष्टीची शहानिशा ही सत्र न्यायालयातच होतो. सत्र न्यायालयाने ती शहानिशा केलेली आहे. त्यामुळे ज्यांनी कुठे जायचं त्यांनी जावं ते मोकळे आहेत, लोकशाहीमध्ये अधिकार आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

अंजली दमानिया देणार हायकोर्टात आव्हान

अंजली दमानिया मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेणार आहेत. “छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची सत्र न्यायालयाकडून महाराष्ट्र सदन केसमधून निर्दोष मुक्तता झाली. या निर्णयाविरोधात मी हाय कोर्टात चॅलेंज करणार आहे” असे ट्विट अंजली दमानिया यांनी केली आहे.

तरी देखील आमच्यावर आरोप

महाराष्ट्र सदन प्रकरण भारतात नव्हे तर जगात गाजलं. महाराष्ट्र सदन फाईव्ह स्टार हॉटेलसारखं बांधण्यात आलं. देशातील अनेक राजकीय पक्ष त्याचा वापर करत आहेत. मंत्रिमंडळाने ठरवल्या प्रमाणे अधंरीतील आरटीओ ऑफिस, हायमाऊंट गेस्ट हाऊसचं काम केलं. महाराष्ट्र सदनाचा वापर ८ वर्ष करतायत. कंत्राटदाराला १०० कोटी रुपयांचा एफएसआय देऊ असं सांगण्यात आलं होतं. मात्र, आजपर्यंत त्याला एक फूट देखील एफएसआय मिळालेला नाही, एक फूट जमीन, एक रुपया देखील त्याला मिळालेला नाही. तरी देखील आमच्या वर ८०० कोटींच्या भ्रष्टाचारांचा आरोप आमच्यावर केले, असं छगन भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

आमच्याविरोधात जोरात मीडिया ट्रायल झाली. ईडीची केस देखील झाली. शेवटी मला आणि समीरला दोन वर्षांहून जास्त काळ तुरुंगात रहावं लागलं. आता सत्र न्यायालात वर्षभर काम सुरु होतं. विधिज्ञांचा सल्ला घेत या प्रकरणातून आम्हाला वगळण्यात यावं यासाठी अर्ज केला. त्यानुसार मला, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ आणि इतर जणांना यातून निर्दोष वगळण्यात आलं, असं भुजबळ म्हणाले.

ईडीची कारवाई निरर्थक

महाराष्ट्र सदनमधून ८०० कोटी रुपये मिळाले यावरुन ईडीने कारवाई केली. मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केल्यानं ईडीच्या गुन्ह्यालाही काही अर्थ उरत नाही. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून काळा पैसा मिळवल्याचा ईडीचा आरोप निर्थक आहे, असं भुजबळ म्हणाले.

साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए पर…

साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए…ये जनता की दुवाएँ है, उन्हे मुक्कमल नहीं होने देती….अशी शेरेबाजी करत भुजबळांचा पुन्हा एकदा शायराना अंदाज दिसून आला. “तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे…त्यांनी कितीही कटकारस्थान केलं तरी थोटामोठ्यांच्या आशीर्वादामुळे आमच्यावरचं विघ्न दूर झालं…पवारसाहेबांचे आभार…जयंतराव-अजितदादांचे आभार…मला मंत्रिमंडळात घेतलं, उद्धवजींचेही आभार, कठीण काळात माझ्यामागे आणि कुटुंबामागे उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आभार भुजबळ यांनी मानले.


हेही वाचा – सत्य परेशान हो सकता है लेकीन…’, महाराष्ट्र सदनप्रकरणी दोषमुक्त झाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -