घरताज्या घडामोडी...कारण 'ते' भ्रष्टाचार करून मुख्यमंत्री झाले, नाना पटोलेंचा हल्लाबोल

…कारण ‘ते’ भ्रष्टाचार करून मुख्यमंत्री झाले, नाना पटोलेंचा हल्लाबोल

Subscribe

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत. कारण ते भ्रष्टाचार करून मुख्यमंत्री झाले आहेत, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोलेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजपचे लोकं वारंवार वादग्रस्त विधानं करत आहेत. महाराजांच्या विचारांनी प्रेरित असलेले आणि भाजपला पाठिंबा देणारे खासदार, आमदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत, कारण ते भ्रष्टाचार करून मुख्यमंत्री झाले आहेत, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा गवगवा करायचा आणि दुसरीकडे भाजपनं त्यांना अपमानित करत राहायचं. त्यामुळे त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. ही महाराष्ट्राच्या जनतेच भूमिका आहे. काँग्रेस पक्षाची आहेच पण महाराष्ट्राची सुद्धा आहे, असं नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भाजपाच्या वतीने मलीन केली जात आहे. पण त्याने काहीही फरक पडणार नाही, उलट त्यांचं तेज अजून वाढत आहे. त्यांनी कितीही अवमान केला तरीही शिवरायांचा विचार संपणार नाही. महाराजांच्या विचारांनी प्रेरित असलेले आमदार जे आहेत. त्यांना महाराजांचा स्वाभिमान असेल तर त्यांनी राजीनामे दिले पाहिजेत, असं पटोले म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : मराठी माणसावर अन्याय करण्याची कर्नाटकची नीती; केसरकरांचा आरोप


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -