पंचवटी : शहरात जनता कर्फ्यू लागू करण्याची मागणी पंचवटी विभागाने केली होती. परंतु त्यास विरोध झाल्यानंतर आता जनतेनीच आठ दिवस व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आपण पंचवटीकर’तर्फे मंगळवार (दि.२३) पासून ३० जूनपर्यंत आठ दिवस ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत जिल्हाधिकार्यांसह महापालिका आयुक्तांची भेट घेत निवेदन सादर केले. दरम्यान हा बंद शासनाकडून नसुन जनता कर्फ्यू काळात सर्वसामान्य नागरिकांना अडचण निर्माण होणार नाही याची व्यापार्यांनी खबरदारी घेण्याबातच्या सूचना जिल्हा व पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. यावेळी आमदार अॅड. राहुल ढिकले, नगरसेवक गुरूमीत बग्गा, शिवसेना महानगरप्रमुख महेश बडवे, उत्तम उगले, शैलेश सूर्यवंशी, अमीत घुगे, प्रवीण काकड आदी उपस्थित होते.
पंचवटीत आजपासून 30 जूनपर्यंत बंद
written By My Mahanagar Team
Nashik
सर्वसामान्य नागरिकांना अडचण निर्माण होणार नाही याची व्यापार्यांनी खबरदारी घेण्याबातच्या जिल्हा व पालिका प्रशासनाकडून सूचना
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -