घरमहाराष्ट्रनाशिकरस्ते दुरुस्ती करा, अन्यथा टोल बंद करा

रस्ते दुरुस्ती करा, अन्यथा टोल बंद करा

Subscribe

नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा इशारा

 नाशिक- पुणे व नाशिक मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून शिंदे व घोटी टोलमध्ये असलेल्या सदोष यंत्रणेमुळे वाहतूकदारांना सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे टोल तरी का भरावा असा प्रश्न वाहतूकदारांसमोर आहे. रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत नाही तोपर्यंत टोल बंद करा,अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने केंद्रीय रस्ते वहातुक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे.

नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी नितीन गडकरी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज आहिरे,नॅशनल हायवे व्यवस्थापक, टोल व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे. शिंदे पळसे व घोटी टोल नाक्यावर फास्ट टॅगची सुविधा अतिशय संथ गतीची असल्याने याठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागून अधिक वेळ लागतो. त्यामुळे वाहतुकदारांचे मोठे नुकसान होत आहे. टोल परिसरात क्रेन, रुग्णवाहिका, युटर्नला बत्ती, रस्त्याच्या कडेला पांढरे पट्टे, स्वच्छता गृहाची अस्वच्छता याबाबत वारंवार तक्रारी देऊनही सुधारणा होत नसल्याने वाहतुकदारामध्ये प्रचंड असंतोष असल्याचे म्हटले आहे. नाशिक-पुणे व नाशिक-मुंबई रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. याठिकाणी व्यवस्थानाकडून रस्त्यांची साधी डागडुजीही होतांना दिसत नाही. शासनाच्या नियमावलीनुसार आवश्यक सुविधा देखील उपलब्ध नसल्याने वाहतुकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाक्यावर टोल कशाचा भरायचा? असा प्रश्न वाहतूक दारांपुढे आहे.

- Advertisement -

आम्ही टोल द्यायला तयार आहोत; मात्र, टोल अंकित रोड आणि त्याच्या सर्व सुविधा चागल्या प्रतीच्या द्याव्यात. जोपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होणार नाही तोपर्यंत टोल घेऊ नये. जर टोल भरण्यास प्रशासनाने बळजबरी केली तर वाहतूकदार व नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
शिंदे टोलनाका व्यवस्थापकांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष राजेंद्र फड, माजी अध्यक्ष जयपाल शर्मा, उपाध्यक्ष बापू ताकाटे, सुभाष जांगडा,उपाध्यक्ष सतीश कलंत्री,अमोल शेळके, पंकज भालेराव, रवि पेहरकर,बाबा शर्मा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे टोलच्या व्यवस्थापकांनी ओव्हरलोड वाहनांच्या सर्रास वापरामुळे रोड खराब होत असल्याचे सांगितले.

सात दिवसांची मुदत

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सात दिवसांची मुदत टोल प्रशासनाने मागितली आहे. या काळात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झाले नाही. तर आक्रमक भूमिका घेत कुठलाही वाहतूकदार टोल भरणार नाही. असे स्पष्ट करण्यात आले.

Rajendra-Phad-minसदोष फास्ट टॅगच्या यंत्रणेमुळे मालवाहतूक दारांना स्कॅन न झाल्यास आपली वाहने पुन्हा मागे घ्यावी लागतात. यावेळी मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. निवेदन देण्यास गेलेल्या पदाधिकार्‍यांना याचा वास्तव अनुभव आला. यावेळी वाहन मागे घेत असतांना अपघात होऊन दोन गाड्यांचे नुकसान झाले. याचा फटका देखील वाहतुकदारांना बसत असल्याने यंत्रणा सुधारण्याची देखील मागणी केलेली आहे.
                 – राजेंद्र फड,अध्यक्ष, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -