घरमहाराष्ट्रक्षुल्लक वादातून दुचाकी जाळली

क्षुल्लक वादातून दुचाकी जाळली

Subscribe

क्षुल्लक कारणांवरुन मारहाण करत दुजाकी जाळल्याचा प्रकार लातूर येथे घडला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्षुल्लक वादातून मारहाण करुन दुचाकी जाळल्याची घटना लातूरमधील महाराणा प्रताप नगर भागात घडली आहे. याप्रकरणी नेताजी ज्योतीराम शिंदे यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले?

लातूरमधील महाराणा प्रताप नगर भागात एका क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. नेताजी ज्योतीराम शिंदे हे घरी असताना त्यांचा लहान मुलगा शेजारी असणाऱ्या सुजीत दिगंबर बारसकर यांच्या घरी गेला. मुगला घरी आलेचे पाहून सुजीत बारसकर यांचे डोके फिरले. शिंदे यांचा मुलगा आपल्या घरी का आला हे विचारण्यासाठी सुजीत बारसकर आणि त्याच्यासोबत असणाऱ्या अन्य एका व्यक्तीने शिंदे यांचे घर गाठले. शिंदे यांच्या घरी जाऊन बारसकर यांनी तुमचा मुलगा आमच्या घरी का आला अशी विचारणा केली. ही विचारणा केल्यानंतर शिंदे आणि बारसकर यांच्या वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, बारसकर आणि त्याच्या साथीदारांने शिंदे यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी रागाच्या भरात नेताजी शिंदे यांच्या घरासमोर असलेली दुचाकी जाळून टाकली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

- Advertisement -

संबंधिक बातम्या –

वाचा – मालाडमध्ये क्षुल्लक वादातून ७ वाहने जाळली

वाचा – क्षुल्लक वादावरुन चिमुरड्याची हत्या

- Advertisement -

वाचा – क्षुल्लक वादातून लहान भावाची चाकूने भोसकून हत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -