घरमहाराष्ट्रअलमट्टी, कोयना तसेच राधानगरीतून पाण्याचा विसर्ग सुरू

अलमट्टी, कोयना तसेच राधानगरीतून पाण्याचा विसर्ग सुरू

Subscribe

अलमट्टी धरणातून ५ लाख ४० हजार क्युसेक, राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून, सध्या धारणातून १४०० क्युसेक तर कोयना धरणामधून ४८ हजार ८९३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

अलमट्टी धरणातून ५ लाख ४० हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज, सोमवारी सकाळी ८.३० वाजता बंद झाले असून, सध्या धारणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून ४८ हजार ८९३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी आज सकाळी दिली. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी ७ वाजता ४९ फूट असून, एकूण ८४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर ८.२१ टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ आणि शिंगणापूर, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव आणि तारळे, कासारी नदीवरील- वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन व यवलूज, तुळशी नदीवरील-बीड, आरे व बाचणी, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, क. वाळवे, तुरूंबे व सुळंबी. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे, मांडूकली, असळज, सांगशी व काताळी. वेदगंगा नदीवरील- गारगोटी, निळपण, वाघापूर व शेणगाव. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे, गजरगाव व दाबीळ. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे, कामेवाडी व ढोलगरवाडी. शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली. धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे व पनोरे, असे एकूण ८४ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या अलमट्टी धरणात १००.७८६ टीएमसी पाणीसाठा आहे, तर कोयना धरणात १०२.५५ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ३.२७ टीएमसी, वारणा ३२.४६ टीएमसी, दूधगंगा २४.१४ टीएमसी, कासारी २.६६ टीएमसी, कडवी २.५२ टीएमसी, कुंभी २.५३ टीएमसी, पाटगाव ३.७२ टीएमसी, चिकोत्रा १.३९, चित्री १.८८ टीएमसी, जंगमहट्टी १.२२ टीएमसी, घटप्रभा १.५६ टीएमसी, जांबरे ०.८२ टीएमसी, कोदे (ल. पा.) ०.२१ टीएमसी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी –

  • राजाराम – ४९ फूट
  • सुर्वे – ४६.११ फूट
  • रुई – ७७.९ फूट
  • इचलकरंजी – ७६ फूट
  • तेरवाड – ८०.१० फूट
  • शिरोळ – ७६.७ फूट
  • नृसिंहवाडी – ७६.७ फूट
  • राजापूर – ६२.१ फूट
  • सांगली – ५१.२ फूट
  • अंकली – ५६.९ फूट

हेही वाचा –

डॉक्टरांचा तणाव आता एका फोन कॉलमुळे होणार कमी

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी प्रवीण परदेशींकडे सोपवली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -