घरमहाराष्ट्रपंतप्रधान आवास योजनेत ठाणे जिल्हा राज्यात पहिला

पंतप्रधान आवास योजनेत ठाणे जिल्हा राज्यात पहिला

Subscribe

पंतप्रधान आवास योजनेत ठाणे जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकवला आहे. तर राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या दोन तालुक्यांमध्ये कल्याण आणि भिवंडी यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत ठाणे जिल्ह्याने ( ग्रामीण ) राज्यात पहिला क्रमांक पटकवला आहे. राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या दोन तालुक्यांमध्ये कल्याण आणि भिवंडी या तालुक्यांचा समावेश आहे. तसेच मोठ्या संख्येनुसार घरकुल पूर्ण करणाऱ्या राज्यातील पहिल्या दहा तालुक्यांमध्ये शहापूर तालुक्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

ठाणे जिल्हा परिषदेला गौरवले जाणार

या कामगिरीची दखल घेत घरकुल राज्य व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून राज्याचे ग्राम विकास सचिव असीम गुप्ता यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषदेला गौरवले जाणार आहे. हा गौरव १ सप्टेंबर रोजी सिडको भवन सभागृह सी.बी. डी. बेलापूर येथे होणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांनी दिली आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारचे घरकुल योजनेचे टप्पे

ही आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत असणाऱ्या शबरी, रमाई, आदिम या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाच्या माध्यमातून या योजना राबवल्या  जातात. या योजने अंतर्गत सन २०१६-१७ वर्षा करिता जिल्ह्याला ३ हजार ३९९ लक्षांक दिले होते. त्यापैकी ३  हजार १४६ पूर्ण करण्यात आले. सन २०१७- १८ करीता ७७४ एवढे लक्षांक दिले होते. त्यापैकी ५२१ घरकुल बांधण्यात आली. तर २०१८- १९ करिता ४६२ लक्षांक देण्यात आला असून, त्यापैकी ४४३ घरांना मंजुरी मिळाली आहे. यंदाच्या वर्षाचा पहिला हप्ता देखील लाभार्त्यांना देण्यात आलेला आहे. आवास योजनेत जिल्ह्याने केलेली कामगिरी कौतुकास्पद असून सरकारने दिलेला लक्षांक पूर्ण करण्यासाठी सर्वच यंत्रणा तत्परतेने काम करत आहेत. सन २०१७-१८ वर्षाचा संपूर्ण लक्षांक ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सगळ्या यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -