राज्यात करोनामुळे तिसरा बळी गेला आहे. कस्तुरबा रुग्णालयात ६५ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. या पुरुष व्यक्तीस ताप, खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे २३ मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ही व्यक्ती यूएई येथे प्रवास करून १५ मार्च रोजी अहमदाबाद येथे आली होती. आणि त्यानंतर २० मार्च रोजी मुंबईत आली. या व्यक्तीस उच्चरक्तदाब तसेच अनियंत्रित मधुमेहाचा त्रास होता. रुग्ण गंभीर असल्या कारणाने उपचारा दरम्यान त्यांचा २३ मार्च रोजी सायंकाळी मृत्यू झाला. त्यांचे कोविड-१९ चाचणीचे पॉझिटिव्ह निदान झाले.
करोना व्हायरस : राज्यात करोनाचा तिसरा बळी
written By My Mahanagar Team
Mumbai
कस्तुरबा रुग्णालयात ६५ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -