घरमहाराष्ट्रअंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज केल्यामुळे तुषार दोशींना बढती - मनोज जरांगे पाटील

अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज केल्यामुळे तुषार दोशींना बढती – मनोज जरांगे पाटील

Subscribe

पुणे : जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. या लाठीचार्जमध्ये अनेक ग्रामस्थ जखमी झाले होते. यात महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. यामुळे जालना जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती. पण तुषार दोशी यांच्याविरोधात होणार विरोध पाहता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.

अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर तुषार दोशींना पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी सोमवारी (20 नोव्हेंबर) नियुक्ती करण्यात आली आहे. तुषार दोषींच्या बदलीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचे बक्षीस तुषार दोशींना दिले असेल, जनतेवर निष्पाप लोकावर कट रचून हल्ला केला. त्यांना जर बढती मिळणार असेल मी त्याची माहिती घेईन. तुषार दोषींवर न्यायालयीन चौकशी बसणार आहे. या प्रकरणातून कोणालाच सुट्टी मिळणार नाही. तुषार दोशींना आजचे समाधान असेल पण त्यांना यातून सुट्टी मिळणार नाही”, असे मनोज जरांगे पाटील कल्याणच्या सभेत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – “अंतरवाली सराटीतील लाठीचार्जची SIT चौकशी करावी”, विजय वडेट्टीवारांची मागणी

गृहमंत्र्यांनी लाठीचार्जचे आदेश दिले नाही तर…

लाठीचार्जचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले नसल्याचे माहित्या अधिकारातून समोर आले आहे, या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “जर राज्याच्या गृहमंत्र्यांनी आदेश दिला नाही. मग सरकारच्या शक्तीचा गैरवापर करणारे कोण आहे. त्यांचा शोध घेतला पाहिजे आणि आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगतो की, तुम्ही त्या व्यक्तीला शोधून काढा.”

- Advertisement -

हेही वाचा – होय, आम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत अन् विकृत; फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

लाठीचार्जची एसआयटी चौकशी मागणी करणार – विजय वडेट्टीवार

अंतरवाली सराटीतील लाठीचार्जसंदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले, “जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला, तो दुर्दैवीच होता. यानंतर पोलिसांना झालेली मारहाण ती देखील अमानुष होती. यात अनेक महिला आणि पोलिसांनाही छरे लागले, अशा घटना सरकार टाळू शकले असते. हे राज्य सरकारचे फेल्युअर आहे, असे मानतो किंवा सरकारने हे जाणून भुजून केले असेल, असे माझे मत आहे. यासंदर्भात चौकशी झाला पाहिजे. आम्ही अधिवेशनात अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जच्या स्पेशल एआयटी नेमणूक किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी करू”, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -