घरताज्या घडामोडीनारायण राणे किंवा निलेश राणेंबरोबर आंबेरकर असतो; विनायक राऊतांचा गंभीर आरोप

नारायण राणे किंवा निलेश राणेंबरोबर आंबेरकर असतो; विनायक राऊतांचा गंभीर आरोप

Subscribe

पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापलं आहे. रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर येथे ६ फेब्रुवारीला अपघात झाला. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता ७ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकर याला अटक करण्यात आली आहे.

पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापलं आहे. रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर येथे ६ फेब्रुवारीला अपघात झाला. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता ७ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकर याला अटक करण्यात आली आहे. मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. (Vinayak Raut Slams Narayan Rane Pandharinath Amberkar Shashikant Warise Death Case)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, “रिफायनरी आणि जमीन दलालांच्या विरोधात मागच्या अनेक वर्षापासून आवाज उठवणारे शशिकांत वारीसे यांचा घातपात झाला. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, न्यायासाठी लढणारे म्हणून वारिसेंचा उल्लेख होता. वारिसे यांच्या हत्येचा पोलिसांनी योग्य तो तपास करण्याची विनायक राऊत यांनी मागणी केली. पंढरीनाथ आंबेरकर हा सराईत गुंड आहे. यापूर्वी असे अनेक प्रयत्न केले. २०२० साली कुंभवडेला मनोज महेकर या तरुणाच्या अंगावरही गाडी घालत ठार करण्याचा प्रयत्न केला होता. कारण, त्याचे वडील रिफायनरी विरोधी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत”, असे विनायक राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -

“आंबेरकर हा रिफायनरीच्या पैशांवर पोसणारा गुंड आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्यांचा कायमस्वरून बंदोबस्त करण्याची जबाबदारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. वारिसेंची हत्या घडवून आणली असून, याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे. यापूर्वी सिंधुदुर्गमध्ये जिल्हा नियोजनची बैठक झाली होती. भाजपाचे जबाबदार केंद्रीय नेते यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत मालवचं सी-वर्ल्ड आणि रिफायनरी याच्याविरोधात येणाऱ्यांची गय करू नका. प्रसंगी पोलिसांचा वापर करून प्रकल्प राबवा, असं वक्तव्य केलं होतं. तसेच, हा गुंडगिरी करणारा आंबेरकर नारायण राणे किंवा निलेश राणेंबरोबर असतो. त्यांच्या चिथावणीमुळे वारीसेसारख्या पत्रकाराची हत्या करण्याचं षडयंत्र आंबेकरने आखले”, असा गंभीर आरोप विनायक राऊतांनी केला आहे.


हेही वाचा – महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? पत्रकार वारीसेंच्या मृत्यू प्रकरणी राऊतांचा फडणवीसांना सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -