अमरावती शहरातील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या झाही होती. या हत्येचा मास्टरमाईंड इरफान खान हा राणा दाम्पत्यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचा गंभीर आरोप मंत्री यशोमती ठाकरू यांनी केला आहे. ज्या ठिकाणी अशा घटना होत आहेत त्या ठिकाणी भाजपची लिंक सोमर येत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. याला आमदार रवी राणा यांनी उत्तर दिले.
अमरावतीच्या खासदारांचे 27 तारखेचे पत्र आणि 28 ला उदयपुरची घटना ही खूप गंभीर बाब आहे. याची चौकशी झाली पाहीजे.अमरावती आणि उदयपूरची घटना पूर्वनियोजित आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. राणा दाम्पत्यांनी काल- परवा हनुमान चालीसा वाचली, किती गडूळ करणार अमरावती असेह त्या म्हणाल्या. भाजप जर अमरावती प्रयोगशाळा करत असतील तर आम्ही हे कदापी होऊ देणार नाही, असे त्या म्हणाल्या.
कोल्हे हत्येचा मुख्य सूत्रधार काँग्रेसचा कार्यकर्ता –
आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी तो आरोपी आमचा नसून काँग्रेसचा सदस्य असल्याचा पलटवार केला.यावेळी आमदार रवी राणा म्हणाले की, 21 जूनला उमेश कोल्हे यांची हत्या झाली आणि 2 जुलै पर्यंत पोलीस रॉबरीचा तपास करत होती, तेही यशोमती ठाकूर यांच्या आदेशाने. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह तपास करत होत्या. पण जेव्हा NIA ची टीम अमरावतीत आली तेव्हा उमेश कोल्हे यांची हत्या कशाने झाले हे उघड होते. यशोमती ठाकूर या लपून छपून उमेश कोल्हे यांच्या घरी जातात, कारण मुस्लिम व्होट बँक कमी होऊ नये म्हणून.
आरोपी इरफान खान हा काँग्रेसचा कार्यकर्ता असून त्याने सदस्य फॉर्म सुद्धा भरलेला आहे. सोबतच शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या बॅनर खाली पण तो दिसला आहे असे आमदार रवी राणा म्हणाले. 27 तारखेच्या पत्रावर आमदार रवी राणा म्हणाले की, ती टाईपिंग मिस्टेक होती. अवघ्या 10 मिनिटात ती दुरुस्ती करून आम्ही 29 तारीख करून पाठवली.