मुंबईतील वांद्रे – वरळी सी-लिंकवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दहा जण जखमी झाले आहेत. सी-लिंकवर चार गाड्यांचा अपघात झाला आहे. अपघात झालेल्या गाड्यांमध्ये रुग्णगवाहिकेचाही समावेश आहे. जखमी झालेल्यांपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान वांद्रयाहून वरळीच्या जाणाऱ्या मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. या गाड्या एकामागून एक येत एकमेकांवर आदळल्या. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले. या अपघातामुळे वरळीहून वांद्रयाच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra | 10 people got injured in a collision between four cars and an ambulance on Mumbai’s Bandra Worli Sea Link pic.twitter.com/7ihc7xnZv5
— ANI (@ANI) October 5, 2022
गाड्या एका पाठोपाठ येऊन आदळल्याने गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर वरळी सी-लिंकवर अपघात झाल्याने गोंधळ उडाला. अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी जाऊन पोलीस या अपघाताचा तपस करत आहेत.
हे ही वाचा – दसरा मेळाव्याला उरले अवघे काही तास, कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने; प्रतिष्ठेच्या लढाईत कोण जिंकणार?