घरमुंबईखड्डे न बुजवणार्‍यांवर कारवाईचा बडगा

खड्डे न बुजवणार्‍यांवर कारवाईचा बडगा

Subscribe

10 दिवसांत खड्डे बुझवण्याचे यंत्रणांचे आश्वासन

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने मुंबई महानगर क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुझवण्यात दिरंगाई, कामचुकारपणा केल्यास अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, अशा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यावेळी सर्व यंत्रणांकडून येत्या दहा दिवसांत खड्डे बुझविण्यात असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना देण्यात आले आहे. पावसाळा संपताच सर्व यंत्रणांकडून खड्डे बुझवण्याची मोहिम ही प्राधान्याने हाती घेण्यात येईल असेही शिंदे म्हणाले. महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रायगड, ठाणे, पालघरचे पालकमंत्री तसेच सर्व पालिकांचे आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जेएनपीटी, एमएसआरडीसी यांसारख्या रस्त्यांशी संबंधित सर्व यंत्रणांसोबत गुरूवारी बैठक पार पडली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले की, या वर्षीचा पाऊस प्रमाणापेक्षा जास्त होता. त्यामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे पडले. तात्पुरती डागडुजी म्हणून पेव्हर ब्लॉक, कोल्ड मिक्सच्या माध्यमातून रस्त्याच्या डागडुजीची कामे करण्यात आली आहेत. पण पाऊस कमी झाल्यावर नक्कीच खड्डे बुजवण्याच्या मोहिमला वेग येईल. पालकमंत्री तसेच लोक प्रतिनिधींनी आपल्या भागातील खड्डयांबाबतचा विषय या बैठकीत मांडला होता. त्यावेळी सर्व यंत्रणांकडून खड्ड्यांच्या विषयावर तातडीने काम करण्यात येईल असे सांगितले.

- Advertisement -

नवरात्री आधीच अनेक ठिकाणी रस्त्यांच्या डागडुजीची कामे सुरू करण्यात येतील. सध्या फक्त पावसाचा अडथळा आहे. सप्टेंबर संपत आला असला तरी पावसाची हजेरी कायम आहे. त्यामुळेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची कामे करण्यात अडचणी येत आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. आरजे मलिष्कापासून ते विविध सेलिब्रिटींनी मुंबई आणि महानगर क्षेत्रात ठाणे, डोंबिवली परिसरातील रस्त्यांवर असणार्‍या खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या होणार्‍या गैरसोईची व्यथा सोशल मिडियावर मांडली. तसेच ठिकठिकाणाहून रस्त्यावरील खड्ड्यांबाबत तक्रारी आल्या. त्यामुळे सर्व यंत्रणांची बैठक घेण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -