घरमनोरंजनमुंबई पोलिसांवर भरोसा नाय काय? शिवसेनेची अमृता फडणवीसांवर टीका

मुंबई पोलिसांवर भरोसा नाय काय? शिवसेनेची अमृता फडणवीसांवर टीका

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केले. त्यावरून सोमवार सकाळपासून बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही ट्विट करत मत व्यक्त केले आहे. मुंबई माणुसकी गमावली अशा तीव्र शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर त्यांच्या या ट्विटला रिट्विट करत शिवसेना युवा नेता वरूण सरदेसाई यांनी तुमच्या घरालाही मुंबई पोलिसांचीच सुरक्षा असल्याचा टोमणा लगावला आहे. अमृता फडणवीस यांच्यावर ट्विटवर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचाही अमृता फडणवीसांवर निशाणा

वरुण सरदेसाई यांच्यानंतर राष्ट्रवादीच्यावतीनेही अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “अमृता फडणवीस यांना फक्त पोलिसांचे अकाऊंट Axis बँकेत उघडण्यातच रस होता. त्या जेव्हा क्रूझच्या टोकावर बसून सेल्फी घेत होत्या, तेव्हा पोलिसांनीच जीव धोक्यात घालून त्यांना वाचवले होते.”, असे ट्विट मुंबई राष्ट्रवादी युवती संघटनेच्या अध्यक्षा अदिती नलावडे यांनी केले आहे.

- Advertisement -

 

काय म्हटले आहे अमृता फडणवीस यांनी

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले आहे.

तर याला प्रत्युत्तर देताना वरूण सरदेसाईन यांनी ट्विट केले की, मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर!!

हेही वाचा –

Covid Pandemic: कोरोना दीर्घकाळ पाठ सोडणार नाही; WHO चा इशारा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -